शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पळसगावची नळ योजना वादात अडकडली

By admin | Updated: July 30, 2014 23:56 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे.

वासेरा : भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत मौजा पळसगाव येथे ६८ लाख रुपयांची योजना पाच वर्षापूर्वी मंजूर झाली. पाच वर्षापासून सदर योजनेचे काम सुरू असून आतापर्यंत नळ योजनेची पाण्याची टाकी बांधकाम, विहीर, विद्युत पंप लाईन व गावापर्यंत पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. सदर कामावर देखरेख ठेवण्याकरिता गावात पाणी पुरवठा समितीची निर्मिती करण्यात आली. समितीच्या ठरावाला महत्त असून आर्थिक व्यवहाराचे अधिकार असून समितीला आहे. असे असतानाही या कामात समिती कुचकामी ठरत असल्याची गावात ओरड आहे.पळसगाव गावाची लोकसंख्या अडीच हजार असून गावात उन्हाळ्यात तिव्र पाणी टंचाई निर्माण होत असते. पाणी टंचाईचा विचार करता मागील पाच वर्षापासून सदर पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. पाच वर्षापासून काम रेंगाळत आहे. सदर कामाचे जुनेच अंदाजपत्रक असल्याने वाढीव अंदाजपत्रक मंजूर करणे आवश्यक आहे. कंत्राटदार, समिती व अभियंता एकमेकांना उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारुन नेत आहेत. वाढीव अंदाजपत्रक मंजूर करण्याकरिता अभियंत्याने स्वत:ची स्वाक्षरी न करता अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटदार अभियंत्याकडे बोट दाखवून उर्वरित काम करण्यास टाळाटाळ करीत आहे तर समिती आम्ही सर्व ठराव दिल्याची माहिती गावकऱ्यांना देत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर गजभिये यांनी संबंधित अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी समितीने वाढीव ठराव दिलाच नसल्याचे स्पष्ट केले.संबंधित अभियंत्यांनी महिन्यात पळसगाव येथे येऊन गावकऱ्यांना लवकर पाणी देऊ, असे आश्वासन दिले. परंतु जुलै महिना होऊनही गावाला अजून पाणी मिळाले नाही. अजूनपर्यंत गावातील पाईपलाईन पूर्ण झालेली नाही तर पाणी कुठून मिळणार, असा प्रश्न निर्माण झला आहे. संबंधित अभियंत्यांनी स्वत:ची स्वाक्षरी न करता वरिष्ठ पातळीवर वाढीव अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. गावात वेगवेगळ्या चर्चेला पेव फूटला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावकऱ्याकरिता पाणी पुरवठा योजना सुरू करावी व पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)