शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

पळसगावची नळ योजना वादात अडकडली

By admin | Updated: July 30, 2014 23:56 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे.

वासेरा : भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत मौजा पळसगाव येथे ६८ लाख रुपयांची योजना पाच वर्षापूर्वी मंजूर झाली. पाच वर्षापासून सदर योजनेचे काम सुरू असून आतापर्यंत नळ योजनेची पाण्याची टाकी बांधकाम, विहीर, विद्युत पंप लाईन व गावापर्यंत पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. सदर कामावर देखरेख ठेवण्याकरिता गावात पाणी पुरवठा समितीची निर्मिती करण्यात आली. समितीच्या ठरावाला महत्त असून आर्थिक व्यवहाराचे अधिकार असून समितीला आहे. असे असतानाही या कामात समिती कुचकामी ठरत असल्याची गावात ओरड आहे.पळसगाव गावाची लोकसंख्या अडीच हजार असून गावात उन्हाळ्यात तिव्र पाणी टंचाई निर्माण होत असते. पाणी टंचाईचा विचार करता मागील पाच वर्षापासून सदर पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. पाच वर्षापासून काम रेंगाळत आहे. सदर कामाचे जुनेच अंदाजपत्रक असल्याने वाढीव अंदाजपत्रक मंजूर करणे आवश्यक आहे. कंत्राटदार, समिती व अभियंता एकमेकांना उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारुन नेत आहेत. वाढीव अंदाजपत्रक मंजूर करण्याकरिता अभियंत्याने स्वत:ची स्वाक्षरी न करता अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटदार अभियंत्याकडे बोट दाखवून उर्वरित काम करण्यास टाळाटाळ करीत आहे तर समिती आम्ही सर्व ठराव दिल्याची माहिती गावकऱ्यांना देत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर गजभिये यांनी संबंधित अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी समितीने वाढीव ठराव दिलाच नसल्याचे स्पष्ट केले.संबंधित अभियंत्यांनी महिन्यात पळसगाव येथे येऊन गावकऱ्यांना लवकर पाणी देऊ, असे आश्वासन दिले. परंतु जुलै महिना होऊनही गावाला अजून पाणी मिळाले नाही. अजूनपर्यंत गावातील पाईपलाईन पूर्ण झालेली नाही तर पाणी कुठून मिळणार, असा प्रश्न निर्माण झला आहे. संबंधित अभियंत्यांनी स्वत:ची स्वाक्षरी न करता वरिष्ठ पातळीवर वाढीव अंदाजपत्रक पाठवल्याची माहिती समोर आली आहे. गावात वेगवेगळ्या चर्चेला पेव फूटला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावकऱ्याकरिता पाणी पुरवठा योजना सुरू करावी व पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)