शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायत  निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. येत्या १२ नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेशही जारी केले.  सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले.सावली नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी मूल, पोंभुर्णासाठी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, गोंडपिपरीसाठी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, कोरपनासाठी उपविभागीय अधिकारी राजुरा आणि जिवतीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रपूर हे आरक्षणसोडतीसाठी नियुक्तलेले पीठासीन अधिकारी आहेत. आरक्षण सोडत शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता संबंधित नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्या-जिल्हाधिकारी भारत निवडणूक आयोगाने  १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला.  त्यानुसार १ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी तर ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे तसेच निकाली काढण्यात येईल. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक व अन्य पात्र नागरिकांनीही या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

८२६ ग्रामपंचायतींत विशेष ग्रामसभाचंद्रपूर :  मतदार नोंदणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती किंवा नोंदीत दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नाव नव्याने नोंदविण्यासाठी विहित अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येतील.  ग्रामपंचायत कार्यालयात आधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फार्मचे नमुने उपलब्ध करून देण्यात येत आहे. मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरित मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावांची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेली नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात येईल. याच दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे ग्रामसभेत उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारणार आहेत.  मतदार यादीत नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांना संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक