शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

धान उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:25 IST

धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देउत्पादनात घट : फवारणी करूनही पीक हातून गेले

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असलेल्या धान उत्पादकांना यंदा जबर फटका बसल्याने तालुक्यातील शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडले आहेत.सिंदेवाही तालुक्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतले जाते. खेड्यापाड्यातही लहान स्वरुपाच्या तलाव-बोड्या असल्यामुळे शेतकºयांचा धान पीक घेण्याकडे अधिक कल असतो. परंतु यावर्षी मात्र निसर्गाची वक्रदृष्टी आणि शासनाच्या दिशाहीन कृषी धोरणामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. उत्पादन खर्चाची अवाढव्य वाढ आणि मातीमोल भाव या कारणामुळे शेतकरी कर्जाच्या बोजात सापडला आहे.तालुक्यात मागील पाच वर्षांपासून धान उत्पादनात घट होत आहे. अधिक उत्पादन घेणाºया शेतकºयांना हमखास पिकणाºया धान शेतीचे भवितव्य किडीमुळे अंधकारमय वाटू लागले आहे. खरीप हंगामात यावर्षी धानावर मावा, तुडतुडा, कडा करपा, मानमोडी, लाल्या या रोगाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी तीन-चार वेळा किटकनाशकाची हजारो रुपये खर्च करून फवारणी केली. मात्र काहीच फायदा झाला नाही.खरीप हंगामात यावर्षी एकरी सात क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. दरवर्षी होत असलेल्या उत्पादनाच्या घटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. उत्पन्नातही घट आणि धानालाही भाव नाही, अशा दुहेरी कचाट्यात धान शेतकरी सापडले आहेत. व्यापारी स्थानिक पातळीवर कोणत्याही धानाच्या भावात वाढ करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधाची दोन-तिनदा फवारणी करून सुद्धा औषधाचा फायदा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.वाढत्या महागाईमुळे आपल्या कुटुंबाचा पालन पोषण व मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, असा मोठा यक्षप्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्याचवेळी दुष्काळ स्थितीचा अंदाज घेताना प्रचलीत आणेवारीचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी शेतकºयांना पीक कर्जाचा काहीच फायदा मिळत नाही. कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने मदत करावी.धानाचे पंचनामे करण्याचे आदेशनागभीड : धान पिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे, हे एकदाचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी पिकाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त धानाचे पीक नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यात घेतले जाते. या तालुक्यात अगोदर पावसाने इंगा दाखवला. या संकटावर मात करून शेतकºयांनी धान पीक जोपासले. आता हे पीक अंतिम टप्प्यात म्हणजे कापणीला आले असताना या धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. यात मावा तुडतुड्यासह करपा, लाल्या व अन्य रोगांचाही समावेश आहे. विविध रोगांच्या आक्रमणाने शेतकरी वर्ग पार हतबल झाले आहेत. हे पीक वाचविण्यासाठी शेतकºयांनी अनेक प्रयत्न केले. दोनदा तिनदा फवारणी केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या फवारणीवर हजारो रुपये शेतकºयांनी खर्च केले असले तरी हा सर्व खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी पार हबकून गेला आहे.दरम्यान माध्यमांनी शेतकºयांची ही अवस्था समोर आणल्याने प्रशासनास जाग आली आणि धानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी यात अडचण येण्याची शक्यता आहे. यात आतापर्यत शेतकºयांची बहुतांश धान कापणी पार पडली आहे. कापणी झालेल्या धानाचा पंचनामाही अधिकाºयांनी करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.उत्पादन घ्यावे कसेतळोधी (बा) : गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला असताना यावर्षी सुद्धा निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हातात येत असलेले धान पीक विविध रोगाने नष्ट झाले आहे. धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांना एकरी २ पोते धानाचे उत्पादन होत असल्यामुळे शेतकºयांसमोर जीवन जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.