शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:25 IST

धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देउत्पादनात घट : फवारणी करूनही पीक हातून गेले

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असलेल्या धान उत्पादकांना यंदा जबर फटका बसल्याने तालुक्यातील शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडले आहेत.सिंदेवाही तालुक्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतले जाते. खेड्यापाड्यातही लहान स्वरुपाच्या तलाव-बोड्या असल्यामुळे शेतकºयांचा धान पीक घेण्याकडे अधिक कल असतो. परंतु यावर्षी मात्र निसर्गाची वक्रदृष्टी आणि शासनाच्या दिशाहीन कृषी धोरणामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. उत्पादन खर्चाची अवाढव्य वाढ आणि मातीमोल भाव या कारणामुळे शेतकरी कर्जाच्या बोजात सापडला आहे.तालुक्यात मागील पाच वर्षांपासून धान उत्पादनात घट होत आहे. अधिक उत्पादन घेणाºया शेतकºयांना हमखास पिकणाºया धान शेतीचे भवितव्य किडीमुळे अंधकारमय वाटू लागले आहे. खरीप हंगामात यावर्षी धानावर मावा, तुडतुडा, कडा करपा, मानमोडी, लाल्या या रोगाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी तीन-चार वेळा किटकनाशकाची हजारो रुपये खर्च करून फवारणी केली. मात्र काहीच फायदा झाला नाही.खरीप हंगामात यावर्षी एकरी सात क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. दरवर्षी होत असलेल्या उत्पादनाच्या घटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. उत्पन्नातही घट आणि धानालाही भाव नाही, अशा दुहेरी कचाट्यात धान शेतकरी सापडले आहेत. व्यापारी स्थानिक पातळीवर कोणत्याही धानाच्या भावात वाढ करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधाची दोन-तिनदा फवारणी करून सुद्धा औषधाचा फायदा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.वाढत्या महागाईमुळे आपल्या कुटुंबाचा पालन पोषण व मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, असा मोठा यक्षप्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्याचवेळी दुष्काळ स्थितीचा अंदाज घेताना प्रचलीत आणेवारीचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी शेतकºयांना पीक कर्जाचा काहीच फायदा मिळत नाही. कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने मदत करावी.धानाचे पंचनामे करण्याचे आदेशनागभीड : धान पिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे, हे एकदाचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी पिकाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त धानाचे पीक नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यात घेतले जाते. या तालुक्यात अगोदर पावसाने इंगा दाखवला. या संकटावर मात करून शेतकºयांनी धान पीक जोपासले. आता हे पीक अंतिम टप्प्यात म्हणजे कापणीला आले असताना या धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. यात मावा तुडतुड्यासह करपा, लाल्या व अन्य रोगांचाही समावेश आहे. विविध रोगांच्या आक्रमणाने शेतकरी वर्ग पार हतबल झाले आहेत. हे पीक वाचविण्यासाठी शेतकºयांनी अनेक प्रयत्न केले. दोनदा तिनदा फवारणी केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या फवारणीवर हजारो रुपये शेतकºयांनी खर्च केले असले तरी हा सर्व खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी पार हबकून गेला आहे.दरम्यान माध्यमांनी शेतकºयांची ही अवस्था समोर आणल्याने प्रशासनास जाग आली आणि धानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी यात अडचण येण्याची शक्यता आहे. यात आतापर्यत शेतकºयांची बहुतांश धान कापणी पार पडली आहे. कापणी झालेल्या धानाचा पंचनामाही अधिकाºयांनी करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.उत्पादन घ्यावे कसेतळोधी (बा) : गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला असताना यावर्षी सुद्धा निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हातात येत असलेले धान पीक विविध रोगाने नष्ट झाले आहे. धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांना एकरी २ पोते धानाचे उत्पादन होत असल्यामुळे शेतकºयांसमोर जीवन जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.