शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अस्थिर वातावरणामुळे धान उत्पादक रडकुंडीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड होणार की, नाही याची चिंता त्यांना पडली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केला घात, विविध रोगांचा प्रादूर्भावशेतात पाणी साचल्यामुळे कापणी करून ठेवलेले धान काढण्याचा प्रश्नशेतकऱ्यांनी हंगामात रंगविलेल्या स्वप्नाचा पुन्हा झाला चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. हाती आलेला घास गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी किडीच्या प्रादूर्भावामुळे शिल्लक असलेले पीक वाचविण्याचा शेतकऱ्यांचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. आर्थिक जुळवाजुळव करून शेती फुलविली. मात्र आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता सध्या शेतकºयांना सतावत आहे.पळसगाव परिसरात चिंता वाढलीलोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : बल्लारपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीसोबतच सोयाबीन व धान पिकांची लागवड केली. लागवड करण्यासाठी पैशाची जुडवाजुडव केली. बँक व सोसायटी मार्फत कर्ज काढले. मात्र परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. या पावसामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे.कापलेले पीक पाण्यात भिजल्यामुळे त्याला कोंब आले. त्यामुळे वर्षभराचे आर्थिक चक्र बिघडले आहे. त्यामुळे पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड होणार की, नाही याची चिंता त्यांना पडली आहे.जिल्ह्यातील धान उत्पादक तालुकेजिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी, नागभीड, सावली, चिमूर, बल्लारपूर तसेच चंद्रपूर आणि राजूरा तालुक्यातील काही शेतकरी मोठ्या प्रमाणात धान उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, भद्रावती आणि इतरही तालुक्यातील काही शेतकरी धानाचे उत्पादन घेतात.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा,वरोरा, भद्रावती, चंद्रपूर तसेच जिवती तालुक्यात काही भागामध्ये सोयाबीन तसेच कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती