शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अस्थिर वातावरणामुळे धान उत्पादक रडकुंडीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड होणार की, नाही याची चिंता त्यांना पडली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केला घात, विविध रोगांचा प्रादूर्भावशेतात पाणी साचल्यामुळे कापणी करून ठेवलेले धान काढण्याचा प्रश्नशेतकऱ्यांनी हंगामात रंगविलेल्या स्वप्नाचा पुन्हा झाला चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. हाती आलेला घास गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी किडीच्या प्रादूर्भावामुळे शिल्लक असलेले पीक वाचविण्याचा शेतकऱ्यांचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. आर्थिक जुळवाजुळव करून शेती फुलविली. मात्र आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता सध्या शेतकºयांना सतावत आहे.पळसगाव परिसरात चिंता वाढलीलोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : बल्लारपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीसोबतच सोयाबीन व धान पिकांची लागवड केली. लागवड करण्यासाठी पैशाची जुडवाजुडव केली. बँक व सोसायटी मार्फत कर्ज काढले. मात्र परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. या पावसामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे.कापलेले पीक पाण्यात भिजल्यामुळे त्याला कोंब आले. त्यामुळे वर्षभराचे आर्थिक चक्र बिघडले आहे. त्यामुळे पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड होणार की, नाही याची चिंता त्यांना पडली आहे.जिल्ह्यातील धान उत्पादक तालुकेजिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी, नागभीड, सावली, चिमूर, बल्लारपूर तसेच चंद्रपूर आणि राजूरा तालुक्यातील काही शेतकरी मोठ्या प्रमाणात धान उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, भद्रावती आणि इतरही तालुक्यातील काही शेतकरी धानाचे उत्पादन घेतात.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा,वरोरा, भद्रावती, चंद्रपूर तसेच जिवती तालुक्यात काही भागामध्ये सोयाबीन तसेच कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती