शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

पावसाअभावी धान पीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:37 PM

वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपांतरण होणे सुरू झाले असून सदर रोग नियंत्रणात आणने कठीण झाले आहे.

ठळक मुद्देमावा तुडतुडा रोगाचे आक्रमण : भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता

निळकंठ नैताम।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपांतरण होणे सुरू झाले असून सदर रोग नियंत्रणात आणने कठीण झाले आहे. पावसाने गेल्या २५ ते ३० दिवसाप्ाांसून दडी मारल्याने पाण्याअभावी धानपीक सुकायला लागल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये खरीप, हंगामाच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकºयांनी नव्या उमेदीने यावर्षी तरी चांगले उत्पादन होणार म्हणून अपार मेहनत करून धान पिकांची लागवड केली. रोवणी झाल्यानंतर पाऊस बºयापैकी आल्याने पिकांची चांगली वाढसुद्धा झाली. मध्यंतरी उन्हाची दाहकता वाढली आणि वातावरणामध्ये बदल झाला. त्यामुळे करपा, गेरू, पांढरा, रोग अशा विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केले. तेव्हा विविध प्रकारची फवारणी करून शेतकºयांनी सदर रोग नियंत्रणात आणले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा वाढल्या. यावर्षी बºया प्रमाणात उत्पादन होणार, असे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शेतकºयांना मात्र पुन्हा मोठा धक्का बसला. धानपीक गर्भाशयातून बाहेर पडून लोंबे तयार होत असतानाच मावा तुडतुडा या रोगाने हल्ला केल्याने हिरवे धानपिक काळसर पडून त्याचे तणसात रूपांतर होणे सुरू झाले आहे. विविध औषधांची फवारणी करूनसुद्धा रोग नियंत्रणात आणणे कठीण झाले असल्याने धान उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने सुद्धा दडी मारल्याने ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते इंजिन व मोटारपंपाने पाणी करून आपले ेधानपिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही, ते मात्र वरूण राजाकडे आकाशाला गवसणी घालून पाणी पाडण्याची विनंती करीत आहेत. एकूणच मावा तुडतुडा रोग नियंत्रणात न आल्यास धान उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार आहे.मजुरांचे भाव वधारलेदरवर्षी फवारणीसाठी मजुरांना अर्ध्या दिवसाचे २०० रूपये तर पूर्ण दिवसाचे ३०० रूपये असा दर होता. परंतु यावर्षी अर्ध्या दिवसाचे ३५० तर पूर्ण दिवसाचे ५५० रूपये द्यावे लागत असल्याने उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने शेतकरी तुर्तास हतबल झाला आहे.कृषी विभागाचे मार्गदर्शन नाहीकोणत्या रोगांवर नेमकी कोणती औषधी फवारावी, शेतकºयांच्या शेतामध्ये नेमका कोणता रोग लागलेला आहे, याची प्रत्यक्षात खात्री करून त्यांना कृषी अधिकाºयांंकडून मार्गदर्शन केले जात नसल्याने खासगी कृषी केंद्र चालकांनी दिलेल्या औषधांची फवारणी करणे सुरू आहे.