शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार कृषिपंप वीज जोडण्या पेडिंग

By admin | Updated: June 1, 2015 01:19 IST

कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू असले तरी शासनाचे धोरणच सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आडकाठी आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंगेश भांडेकर  चंद्रपूरकृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू असले तरी शासनाचे धोरणच सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आडकाठी आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी पंपाच्या साह्याने शेती सिंचीत करून उत्पन्न घेता यावे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे अर्ज केले, पैसे भरले. मात्र वीज वितरणच्या धोरणामुळे जिल्ह्यातील तब्बल ४०२७ शेतकऱ्यांना कृषी पंप वीज कनेक्शनसाठी वेटींगवर राहण्याची पाळी आली आहे. अधिकाधिक शेतजमीन सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. अशातच शासनाने विविध योजनाही शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही, त्यांना कृषी विभागामार्फत आॅईल इंजिन, कृषी पंप असे साहित्य दिले जात आहे. मात्र वीज कनेक्शनसाठी दोन ते तीन महिन्यांचा नाही तर चक्क तीन ते चार वर्षांचा कालावधी लागत आहे.३१ मार्च २०१४ पर्यंत जिल्ह्यातील २७५४ कृषी पंपधारक शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत होते. २०१४-१५ या वर्षांत पून्हा ३९२९ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी अर्ज केले. यापैकी २६५६ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली. तर ४०२७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वेटींगवर ठेवण्यात आले आहे. शेतकरी वीज कनेक्शनसाठी वीज वितरण कार्यालयाचे उंबरटे झिजवत असून त्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही. उत्पादन वाढवायचे तर कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असून डिमांड भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जोडणी देण्याची मागणी आहे. उत्पन्न वाढीचे स्वप्न भंगलेनिसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पंप वरदान ठरत आहेत. हवे त्या वेळी कृषी पंपाद्वारे पाणी देता येते. मात्र वीज वितरणच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे स्वप्न भंगले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना शेतजमीन सिंचीत करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. पावसाळा व दुर्गम भागामुळे अडचणी कृषी पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित राहण्यासाठी पावसाळा व दुर्गम भाग यामुळे अडचणी येत असल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे. वीज खांब पंपापर्यंत नेण्यासाठी हिवाळ्यात व पावसाळ्यात अडचणी येतात, तर विद्युत तारा पसरविण्यासाठीही अडचणी येत असल्याचे वीज वितरणने म्हटले आहे. कंत्राट प्रक्रियेने होणार वीज जोडण्यावीज जोडण्या देण्याचे काम हे कंत्राट पद्धतीने करण्यात आले आहे. कंत्राटदारांची नेमणूक करून कामे सोपविण्यात आली आहेत. लवकरच वीज जोडण्या पूर्ण होतील असे वीज वितरणचे म्हणणे आहे. मात्र वारंवार विनवणी करूनही कंत्राटदार जोडणी देण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.