शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पॅकिंग हाऊस योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: October 6, 2016 01:32 IST

शासनामार्फत शेतकऱ्यांचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात.

पाच शेतकऱ्यांना लाभ : पूर्ववत सुरू करण्याची मागणीचिखलपरसोडी : शासनामार्फत शेतकऱ्यांचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र अनेक योजना फक्त नावापुरत्याच मर्यादित असतात. तर बहुतेक योजना काही काळासाठीच सुरू करून त्यामध्ये तथ्य नसल्याचे किंवा अन्य काही कारण समोर करुन ती योजनाच बंद करण्यात येत असते. नागभीड तालुक्यात राबविलेली पॅकिंग हाऊस ही योजना अशाप्रकारेच फोल ठरली. महाराष्ट्र शासनाने २०१३ - १४ मध्ये प्रत्येक तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र फलोउत्पादन विकास’ या योजनेचा शुभारंभ केला. त्याद्वारे शेतीमध्ये भाजीपाला, फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उत्पादीत माल खराब न होता त्यांना चांगला भाव मिळावा, याकरिता त्याची योग्य देखभाल व साठवण करुन ठेवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्याद्वारे चांगल्या पद्धतीने पॅकिंग करता यावी, व उत्तम भाव मिळावा हा उद्देश होता. मात्र नागभीड तालुक्यात ही योजना थंडबस्त्यात दिसून येत आहे. अनेक लाभार्थी पात्र असूनही या योजनपासून वंचित आहेत. तालुक्यातील फक्त पाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. अनेक शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, जिल्हास्तरावरून पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतरच त्याचा प्रस्ताव तयार करू, असे सांगण्यात आले आहे.पॅकिंग हाऊस ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतावरील भाजीपाला फळ झाडे लागवडीकडे शेतकरी वळून आर्थिक प्रगती होण्यास प्रोत्साहन देणारी असल्याने ही योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. (वार्ताहर)