शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणीच्या कामांना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:49 IST

जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.

ठळक मुद्देजलसाठ्यात झाली वाढ : पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आद्रा व पुनर्वसन हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने धान पऱ्हे करपण्यास सुरुवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात पाऊस बरसला. रविवारी आणि सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदींच्या जलसाध्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतिक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा- अर्जा करुन वरुण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात आले. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर चार दिवसांपासून पाऊस सुरु झाला. दमदार व संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले. त्याचे पऱ्हे सुद्धा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, सावली, मूल आदी तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे. मागील काही वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे काही शेतकरी बाहेरगावावरुन मजूर आणत असून रोवणीची कामे करून घेत आहेत. ज्या गावात बहुतांश जणांकडे शेतजमीन आहे. असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजूरांचा आधार घेतला जात आहे. एकूणच सर्वत्र धानपिक रोवणीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, कोरपना, राजुरा,जिवती, वरोरा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी असून या शेतकºयांनाही पावसासामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.