शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणीच्या कामांना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:49 IST

जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.

ठळक मुद्देजलसाठ्यात झाली वाढ : पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आद्रा व पुनर्वसन हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने धान पऱ्हे करपण्यास सुरुवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात पाऊस बरसला. रविवारी आणि सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदींच्या जलसाध्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतिक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा- अर्जा करुन वरुण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात आले. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर चार दिवसांपासून पाऊस सुरु झाला. दमदार व संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले. त्याचे पऱ्हे सुद्धा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, सावली, मूल आदी तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे. मागील काही वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे काही शेतकरी बाहेरगावावरुन मजूर आणत असून रोवणीची कामे करून घेत आहेत. ज्या गावात बहुतांश जणांकडे शेतजमीन आहे. असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजूरांचा आधार घेतला जात आहे. एकूणच सर्वत्र धानपिक रोवणीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, कोरपना, राजुरा,जिवती, वरोरा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी असून या शेतकºयांनाही पावसासामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.