शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

धान रोवणीच्या कामांना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:49 IST

जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.

ठळक मुद्देजलसाठ्यात झाली वाढ : पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आद्रा व पुनर्वसन हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने धान पऱ्हे करपण्यास सुरुवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात पाऊस बरसला. रविवारी आणि सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदींच्या जलसाध्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतिक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा- अर्जा करुन वरुण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात आले. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर चार दिवसांपासून पाऊस सुरु झाला. दमदार व संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले. त्याचे पऱ्हे सुद्धा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, सावली, मूल आदी तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे. मागील काही वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे काही शेतकरी बाहेरगावावरुन मजूर आणत असून रोवणीची कामे करून घेत आहेत. ज्या गावात बहुतांश जणांकडे शेतजमीन आहे. असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजूरांचा आधार घेतला जात आहे. एकूणच सर्वत्र धानपिक रोवणीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, कोरपना, राजुरा,जिवती, वरोरा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी असून या शेतकºयांनाही पावसासामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.