शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

वेकोलितील कोळशाची ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

फोटो प्रकाश काळे गोवरी : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सर्रास जीवघेणी ...

फोटो

प्रकाश काळे

गोवरी : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सर्रास जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून आल्याने ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती, गोवरी, पोवनी, गोवरी डीप कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. अनेकदा कोळशाची वाहतूक करताना ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा पल्ल्याच्या वरती कोळसा भरला जातो. रस्त्याने जाताना अशी ओव्हरलोड वाहतूक नेहमीच नागरिकांसाठी जीवघेणी ठरली आहे. परंतु याकडे आजपर्यंत कुणीही लक्ष दिले नाही .त्यामुळे दिवसेंदिवस रस्ता अपघातात वाढ झाली आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. परंतु आजपर्यंत कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक पोलीस विभाग अपयशी ठरला आहे. ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याचे बारा वाजले आहेत. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा वाहनातून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे अजून कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोणतीही वाहतूक करताना वाहतूक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या पासिंगपेक्षा अधिक मालाची वाहनातून वाहतूक करता येत नाही. बहुतांश वाहनातून कोळसा खाली पडू नये किंवा प्रदूषण होऊ नये, यासाठी ताडपत्री झाकणे बंधनकारक असताना मात्र वेकोलित वाहतुकीचे हे नियम पाळले जात नाही.त्यामुळे वेकोलितील ओव्हरलोड वाहतूक आता नागरिकांच्या जीवावर उठली आहे.

बॉक्स

वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष

कोळसा खाणीतून दिवस-रात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक केली जात असताना याकडे वाहतूक शाखा जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा वाहनावर कारवाई करणे गरजेचे असताना ओव्हरलोड वाहतुकीवर कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही.

त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंकाच व्यक्त केली जात आहे.

कोट_

वेकोलितून केली जाणारी ओव्हरलोड वाहतूक नागरिकांसाठी अतिशय जीवघेणी झाली आहे. अनेकदा ट्रकमधून कोळसा पडून अपघाताच्या गंभीर घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालण्याची गरज आहे.

-प्रमोद लांडे,नागरिक गोवरी.