शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वर्ष लोटूनही महाराष्ट्र सीमेचा फलक रस्त्याच्या कडेलाचफलकाचे भंगारात होतेय रूपांतर : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

By admin | Updated: July 9, 2017 00:45 IST

महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर, कोरपना, तालुक्यातील परसोडा गावानजिक उपाशा नाला येथे राज्य सीमा फलक लावण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर, कोरपना, तालुक्यातील परसोडा गावानजिक उपाशा नाला येथे राज्य सीमा फलक लावण्यात आला होता. मात्र या सीमा स्वागत फलकाचे लोखंडी रॉड कुजल्याने व वादळामुळे हा फलक मागील वर्षी जून महिन्यात रस्त्यादरम्यान कोसळला. महामार्गावर वाहतुकीला अडथळा होत असल्याने चाकरमान्यांनी हा फलक रस्त्याच्या कडेला बाजूने सारून ठेवला, परंतु याला एक वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही हा फलक आजतागायत रस्त्यालगतच पडला आहे.तेव्हापासून सदर फलक पूर्णत: भंगारात रूपांतरित आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र विदर्भ राज्याच्या फलक डौलात उभा असल्याने नव्याने राज्यात दाखल होणाऱ्यांना आपण विदर्भ की महाराष्ट्र राज्यात आहो याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. तेव्हा येथील जनतेचीही विदर्भ राज्य व्हावे, अशीच मानसिकता झाली असताना महाराष्ट्र राज्य सीमेचाही फलक उभारून रिकामा खर्च करून निधी कशाला दवडायचा असा तर प्रश्न संबंधित अधिकारीही विदर्भातीलच असल्याने त्यांना पडला नसावा ना? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो आहे.या सीमा फलकामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सीमेबाबतची माहिती होत होती. शिवाय या फलकावर प्रमुख शहराचे अंतर नोंदविण्यात वणी मार्ग जात असल्याने यामार्गेसुद्धा नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वरोरा ही शहरे गाठता येतात. मात्र राजूरा मार्गे हे अंतर दर्शविले असल्याने नागपूर व वाराणसी शहराचे अंतर अधिक दिसून येते. अलिकडे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र ना रस्त्यात बदल किंवा दिमाखदार राज्यसीमेवर फलक नसल्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणनेही धाडसाचेच ठरते आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या मार्गावरुन हैद्राबाद, नागपूर, नांदेड, लातूर, परभणी, यवतमाळ, रायपूर, भोपाल, छिंदवाडा, लांबपल्याची जडवाहने दररोज धावतात. त्यामुळे नवीन वाहतुकदारही संभ्रमात पडतात. त्यांना रस्त्यावरील नागरिकांकडून मार्गासंबंधी माहिती घ्यावी लागते आहे. विदर्भवाद्यांची उभारलेला फलक दिमाखात उभाविदर्भवाद्यांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेल्या विदर्भ राज्याच्या फलकातून विदर्भवादी व विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात येत असल्यातरी या मागणीकडे केंद्रसरकारचे दुर्लक्ष होते आहे. मात्र येथे महाराष्ट्र राज्याच्या सीमा तुटलेल्या स्वागत फलकाकडे खुद्द प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याने येथील प्रशासनाला पण वेगळा विदर्भच पाहिजे, असे वाटते.