शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष लोटूनही महाराष्ट्र सीमेचा फलक रस्त्याच्या कडेलाचफलकाचे भंगारात होतेय रूपांतर : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

By admin | Updated: July 9, 2017 00:45 IST

महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर, कोरपना, तालुक्यातील परसोडा गावानजिक उपाशा नाला येथे राज्य सीमा फलक लावण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर, कोरपना, तालुक्यातील परसोडा गावानजिक उपाशा नाला येथे राज्य सीमा फलक लावण्यात आला होता. मात्र या सीमा स्वागत फलकाचे लोखंडी रॉड कुजल्याने व वादळामुळे हा फलक मागील वर्षी जून महिन्यात रस्त्यादरम्यान कोसळला. महामार्गावर वाहतुकीला अडथळा होत असल्याने चाकरमान्यांनी हा फलक रस्त्याच्या कडेला बाजूने सारून ठेवला, परंतु याला एक वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही हा फलक आजतागायत रस्त्यालगतच पडला आहे.तेव्हापासून सदर फलक पूर्णत: भंगारात रूपांतरित आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र विदर्भ राज्याच्या फलक डौलात उभा असल्याने नव्याने राज्यात दाखल होणाऱ्यांना आपण विदर्भ की महाराष्ट्र राज्यात आहो याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. तेव्हा येथील जनतेचीही विदर्भ राज्य व्हावे, अशीच मानसिकता झाली असताना महाराष्ट्र राज्य सीमेचाही फलक उभारून रिकामा खर्च करून निधी कशाला दवडायचा असा तर प्रश्न संबंधित अधिकारीही विदर्भातीलच असल्याने त्यांना पडला नसावा ना? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो आहे.या सीमा फलकामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सीमेबाबतची माहिती होत होती. शिवाय या फलकावर प्रमुख शहराचे अंतर नोंदविण्यात वणी मार्ग जात असल्याने यामार्गेसुद्धा नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वरोरा ही शहरे गाठता येतात. मात्र राजूरा मार्गे हे अंतर दर्शविले असल्याने नागपूर व वाराणसी शहराचे अंतर अधिक दिसून येते. अलिकडे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र ना रस्त्यात बदल किंवा दिमाखदार राज्यसीमेवर फलक नसल्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणनेही धाडसाचेच ठरते आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या मार्गावरुन हैद्राबाद, नागपूर, नांदेड, लातूर, परभणी, यवतमाळ, रायपूर, भोपाल, छिंदवाडा, लांबपल्याची जडवाहने दररोज धावतात. त्यामुळे नवीन वाहतुकदारही संभ्रमात पडतात. त्यांना रस्त्यावरील नागरिकांकडून मार्गासंबंधी माहिती घ्यावी लागते आहे. विदर्भवाद्यांची उभारलेला फलक दिमाखात उभाविदर्भवाद्यांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेल्या विदर्भ राज्याच्या फलकातून विदर्भवादी व विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात येत असल्यातरी या मागणीकडे केंद्रसरकारचे दुर्लक्ष होते आहे. मात्र येथे महाराष्ट्र राज्याच्या सीमा तुटलेल्या स्वागत फलकाकडे खुद्द प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याने येथील प्रशासनाला पण वेगळा विदर्भच पाहिजे, असे वाटते.