शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

वर्ष लोटूनही महाराष्ट्र सीमेचा फलक रस्त्याच्या कडेलाचफलकाचे भंगारात होतेय रूपांतर : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

By admin | Updated: July 9, 2017 00:45 IST

महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर, कोरपना, तालुक्यातील परसोडा गावानजिक उपाशा नाला येथे राज्य सीमा फलक लावण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर, कोरपना, तालुक्यातील परसोडा गावानजिक उपाशा नाला येथे राज्य सीमा फलक लावण्यात आला होता. मात्र या सीमा स्वागत फलकाचे लोखंडी रॉड कुजल्याने व वादळामुळे हा फलक मागील वर्षी जून महिन्यात रस्त्यादरम्यान कोसळला. महामार्गावर वाहतुकीला अडथळा होत असल्याने चाकरमान्यांनी हा फलक रस्त्याच्या कडेला बाजूने सारून ठेवला, परंतु याला एक वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही हा फलक आजतागायत रस्त्यालगतच पडला आहे.तेव्हापासून सदर फलक पूर्णत: भंगारात रूपांतरित आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र विदर्भ राज्याच्या फलक डौलात उभा असल्याने नव्याने राज्यात दाखल होणाऱ्यांना आपण विदर्भ की महाराष्ट्र राज्यात आहो याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. तेव्हा येथील जनतेचीही विदर्भ राज्य व्हावे, अशीच मानसिकता झाली असताना महाराष्ट्र राज्य सीमेचाही फलक उभारून रिकामा खर्च करून निधी कशाला दवडायचा असा तर प्रश्न संबंधित अधिकारीही विदर्भातीलच असल्याने त्यांना पडला नसावा ना? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो आहे.या सीमा फलकामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सीमेबाबतची माहिती होत होती. शिवाय या फलकावर प्रमुख शहराचे अंतर नोंदविण्यात वणी मार्ग जात असल्याने यामार्गेसुद्धा नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वरोरा ही शहरे गाठता येतात. मात्र राजूरा मार्गे हे अंतर दर्शविले असल्याने नागपूर व वाराणसी शहराचे अंतर अधिक दिसून येते. अलिकडे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र ना रस्त्यात बदल किंवा दिमाखदार राज्यसीमेवर फलक नसल्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणनेही धाडसाचेच ठरते आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या मार्गावरुन हैद्राबाद, नागपूर, नांदेड, लातूर, परभणी, यवतमाळ, रायपूर, भोपाल, छिंदवाडा, लांबपल्याची जडवाहने दररोज धावतात. त्यामुळे नवीन वाहतुकदारही संभ्रमात पडतात. त्यांना रस्त्यावरील नागरिकांकडून मार्गासंबंधी माहिती घ्यावी लागते आहे. विदर्भवाद्यांची उभारलेला फलक दिमाखात उभाविदर्भवाद्यांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेल्या विदर्भ राज्याच्या फलकातून विदर्भवादी व विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात येत असल्यातरी या मागणीकडे केंद्रसरकारचे दुर्लक्ष होते आहे. मात्र येथे महाराष्ट्र राज्याच्या सीमा तुटलेल्या स्वागत फलकाकडे खुद्द प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याने येथील प्रशासनाला पण वेगळा विदर्भच पाहिजे, असे वाटते.