शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

३३९ प्रस्तावांपैकी केवळ निम्मे प्रस्तावच मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा : योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी मृगजळ

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरु केलेले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. मागील चार वर्षात या योजनेसाठी ३३९ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ १४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. तर ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे.शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य: स्थितीत चार वर्षाचे मिळून त्रुटी पुर्ततेकरिता ७३ प्रस्ताव प्रलंबित असून ६४ प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहेत.शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊ न शासनाने विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी करुन प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जातात. पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी देऊन संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो. मात्र जाचक अटींमुळे अनेकजण वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.अशी मिळते मदतगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रूपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास सबंधित शेतकºयाला एक लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.यांना मिळतो योजनेचा लाभपाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, रस्ता, रेल्वे अपघात, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकऱ्यांला विमा दिला जातो.योजनेसाठी आवश्यक कागपदत्रगोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत सादर करणे गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र. ६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज सादर करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती