शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

३३९ प्रस्तावांपैकी केवळ निम्मे प्रस्तावच मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा : योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी मृगजळ

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरु केलेले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. मागील चार वर्षात या योजनेसाठी ३३९ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ १४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. तर ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे.शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य: स्थितीत चार वर्षाचे मिळून त्रुटी पुर्ततेकरिता ७३ प्रस्ताव प्रलंबित असून ६४ प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहेत.शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊ न शासनाने विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी करुन प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जातात. पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी देऊन संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो. मात्र जाचक अटींमुळे अनेकजण वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.अशी मिळते मदतगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रूपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास सबंधित शेतकºयाला एक लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.यांना मिळतो योजनेचा लाभपाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, रस्ता, रेल्वे अपघात, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकऱ्यांला विमा दिला जातो.योजनेसाठी आवश्यक कागपदत्रगोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत सादर करणे गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र. ६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज सादर करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती