शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

३३९ प्रस्तावांपैकी केवळ निम्मे प्रस्तावच मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा : योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी मृगजळ

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरु केलेले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. मागील चार वर्षात या योजनेसाठी ३३९ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ १४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. तर ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे.शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य: स्थितीत चार वर्षाचे मिळून त्रुटी पुर्ततेकरिता ७३ प्रस्ताव प्रलंबित असून ६४ प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहेत.शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊ न शासनाने विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी करुन प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जातात. पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी देऊन संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो. मात्र जाचक अटींमुळे अनेकजण वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.अशी मिळते मदतगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रूपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास सबंधित शेतकºयाला एक लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.यांना मिळतो योजनेचा लाभपाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, रस्ता, रेल्वे अपघात, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकऱ्यांला विमा दिला जातो.योजनेसाठी आवश्यक कागपदत्रगोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत सादर करणे गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र. ६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज सादर करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती