शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

सुभाषचंद्र बोस यांच्या फाईल्स नष्ट करण्यासाठी दिले होते आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 11:43 IST

इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी पत्रकाराशी बोलताना केला.

ठळक मुद्देचंद्रकुमार बोस यांचा आरोप चौकशीसाठी एसआयआटी गठित करण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिले होते. इतकेच नव्हे, चार मंत्र्यांना त्यांच्या विभागाची कामे सोडून या फाईल्सचा अभ्यास करून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी पत्रकाराशी बोलताना केला. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या विनंतीवरून एका कार्यक्रमासाठी चंद्रकुमार बोस चंद्रपुरात आले होते.सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. ज्या तारखेला नेताजींचा मृत्यू दाखविलेला आहे. त्या दिवसापूर्वी एक महिना आणि नंतरचा एक महिना या काळात कोणत्याही विमानाने घटनास्थळ दाखविलेल्या ठिकाणाहून उड्डाण घेतले नसल्याचे पुरावे आहेत. मात्र विद्यमान स्थितीत नेताजी जिवंत नसावे, कारण आजघडीला त्यांचे वय १२२ वर्षे आहे. इतकी वर्षे कुणीही जिवंत राहू शकत नाही, असेही ते म्हणाले. नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टीगेटींग टीम (एसआयटी) गठित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे केली आहे. एसआयटीच्या माध्यमातून जपान, सोव्हिएत रशिया व इंग्लंडमध्ये जावून चौकशी करावी लागेल. तेथे असलेल्या कागदपत्रांवरून सत्य पुढे येण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली. प्रतंप्रधान मोदी यांनी एसआटी गठित करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलल्याची माहितीही चंद्रकुमार बोस यांनी यावेळी दिली.नेताजी सुभाषचंद्र बोस हे अखंड भारताचे पहिले पंतप्रधान होते. २१ आॅक्टोबर १९४३ रोजी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. या घटनेला आता ७५ वर्षे झाली आहे. मात्र त्यांना ७५ वर्षांत सन्मान मिळालेला नाही. ही इतिहास दाबून ठेवण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार हा इतिहास बाहेर काढण्याचे काम करीत आहे. दिल्लीच्या लालकिल्ल्यावर तिरंगा फडकाविण्याची इच्छा नेजाती बाळगून होते. त्यानंतरच भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल, अशी त्यांची भावना होती. नेताजींची ही इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ आॅक्टोबर २०१८ रोजी लालकिल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकावून पूर्ण केली, याकडेही चंद्रकुमार बोस यांनी लक्ष वेधले.नेताजींच्या आझाद हिंंद सेनेत ६० हजार सौनिक होते. पैकी २६ हजार सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. हा इतिहासही गडप केला आहे. मात्र त्यांच्या सैन्यातील काही सैनिक आजही जिवंत आहे. येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर पथसंचलनात सहभागी करून त्यांना सन्मान दिला जाणार आहे. ७५ वर्षांनंतर मोदींच्या नेतृत्त्वातील सरकारकडून नेताजींना सन्मान मिळत असल्याचेही चंद्रकुमार बोस म्हणाले.

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस