शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

मनपात विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:50 IST

शहरात विविध चौकांमध्ये पुतळे उभारणे, मुख्य मार्गावरील रस्ते रूंदीकरणासाठी फुटपाथ तोडून नव्याने बांधणे आणि शहरातील अनेक भागात प्रलंबित असलेले गुंठेवारी प्रकरण आणि रिंगरोड संदर्भातील विषयांवर मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक आणि सत्ताधारी गटामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देआमसभा गाजली : मनपा सभागृहाला राणी हिराईचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात विविध चौकांमध्ये पुतळे उभारणे, मुख्य मार्गावरील रस्ते रूंदीकरणासाठी फुटपाथ तोडून नव्याने बांधणे आणि शहरातील अनेक भागात प्रलंबित असलेले गुंठेवारी प्रकरण आणि रिंगरोड संदर्भातील विषयांवर मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक आणि सत्ताधारी गटामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. विरोधक आणि महापौर अंजली घोटेकर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. विरोधी बाकारील नगरसेवक पप्पू देशमूख, दीपक जयस्वाल, अनिल रामटेके, स्नेहल रामटेके, अमजद , सुनिता लोढीया आदी नरगसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांना विविध विषयावर प्रश्न विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला मात्र सत्तारूढ गटातील नगरसवेकांनी महापौरांची बाजू सावरून धरली असली तरी आमसभेत विविध प्रश्नांवर चांगलाच गदारोळ झाला.आमसभेला प्रारंभी नवनियुक्त समित्यांमधील सदस्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेट आणि जटपरा गेट ते कस्तूरबा चौक या दोन्ही मार्गाचा रूंदीकरणाचा प्रस्ताव चर्चेला येताच नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी यावर आक्षेप घेत त्या रस्त्यालगती झाडे तोडणार काय असा प्रश्न विचारला. महापौर घोटेकर यांनी रस्ता रूंदीकरणासाठी आवश्यक असेल त्या ठिकाणचेच झाड परवानगीने तोडण्यात येतील सरसकट झाड तोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. मनपा हद्दीतील रस्ते कामांसाठी वारंवार परमार नावाचेच वंष्ठत्राटदार कसे काय निविदा भरतात आणि गत तीन वर्षांपासून त्यांनाच कंत्राट मिळत आहे यावर जयस्वाल यांनी आक्षेप घेतला. शहराच्या वाढीव हद्दीबाबतचा प्रश्न नगरसेवक पप्पू देशमूख यांनी उपस्थित केला व त्यासंदर्भात काढण्यात येत असलेल्या टेंडर प्रक्रीयेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावत यात घोळ होत असल्याचा आरोप केला.बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचे काम अंत्यत धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप बसपाचे गटनेते अनिल रामटेके यांनी केला. यावर महापौर घोटेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभगाला विचारणा करण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांना दिले. बसपाचे गटनेते रामटेके व शिवेसेनेचे सुरेश पचारे हे दोघेही मागच्या बाकावर बसले होते. त्यामुळे पचारे यांनी गटनेत्यांना सभागृहात बसण्यासाठी ठिकाण आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात चांगलाच हशा पिकला. हा गंमतीचा भाग वगळता महापौरांनी प्रशासनाला पुढील सभेत गटनेत्यांसाठी बसण्यासाठी त्यांच्या नावाच्या पाट्या ठेवण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या.चंद्रपूर शहरावर गोंड राजाचे राज्य होते. आदीवासी असलेल्यांच्या शूरविरांचे शहरात पुतळे उभारण्या यावे असा प्रस्ताव चचेर्ला आला असता त्यावर प्रचंड गदारोळ झाला. महापौरांनी तर आज सकाळीच आपल्याला एका आदिवासी नेत्याने फोन करून शहरात आदिवासी शूरविरांचे पुतळे उभारा, अशी धमकीवजा ताकीद दिल्याचे सभागृहात सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव का चर्चेत का आणण्यात आला नाही, यावरही चांगलाच गदारोळ झाला. या विषयाला अनुसरूनच महापौर घोटेकर यांनी राणी हिराई यांचे नाव चंद्रपूर मनपातील सभागृहाला देण्यात यावे, असा ठराव मांडला. या ठराला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. जिल्हास्तरीय अल्पासंख्यांक समितीवर मनपाकडून एक सदस्य नामनिर्देशित करावयाचे असल्याने आजच्या सभेत महापोर अंजली घोटेकर यांनी नगरसेवक रवी आसवाणी यांचे नाव घोषित केले. मात्र विरोधकांनी अल्पसंख्यांकमध्ये कोणकोणत्या धर्माचा समावेश आहे, हे सांगावे असे सूचित करताच आसवाणी यांच्या नावाला विरोध झाला. अखेर गटनेत्यांनी आपल्याकडील अल्पसंख्याक सदस्यांची नावे द्यावीत त्यावर कागदपत्रे तपासणीअंती कोणाचे नाव निश्चित करायचे हे ठरविले जाईल, असा निर्णय घेतला.रिंगरोडवरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकचंद्रपूर शहरासाठी हॉटेल ट्रायस्टार ते मूल मार्गावरील एमइएल चौकापर्यंत ५६० कोटी रूपयांचा नवा उड्डाणपूल प्रस्तावित असल्यामुळे यापूर्वी हॉटेल ट्रायस्टार पासून प्रस्तावित केलेला रिंगरोडचा विषय रद्द करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केली. यावर काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढीया यांनी आक्षेप घेत कडाडून विरोध करीत महापौरांच्या आसनाकडे धावून गेले. भाजपाचे नगरसेवक संदीप आवारी यांनी नंदू नागरकर यांना पकडून ठेवले तर सविता कांबळे आणि सुनिता लोढीया यांच्यात शब्दिक चकमक उडाली.दूषित पाण्याची बाटली सभागृहातइंदिरानगर भागातील नगरसेवक अजमद यांनी चक्क दूषित पाण्याने भरलेली बॉटलच सभागृहाला दाखवून पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौरांनी सदर दूषित पाणी कुठलेही आणले असाल असा शेरा मारत खिल्ली उडविली तर अजय सरकार यांनी पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीने लिकेज झालेली पाईप लाईन दुरूस्त केल्याचे सांगितले. विरोधक मात्र या कंपनीच्या विरोधात ओरडत होते.