शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

भूसंपादनाची कार्यवाही थंडबस्त्यात

By admin | Updated: December 15, 2014 22:52 IST

शासनाने भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून २०१३ ला नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला. अधिनियमाचे नियम २७ आॅगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे

प्रकल्प रखडले : शेतकऱ्यांच्या आशा निसर्गावर चंद्रपूर : शासनाने भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून २०१३ ला नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला. अधिनियमाचे नियम २७ आॅगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात या कायद्यानुसार भूसंपादनाची एकही कार्यवाही न झाल्याने अनेक प्रकल्पाच्या जमीनीचा प्रश्न रेंगाळला आहे. चिमूर, गोंडपिंपरी व मूल या तीन उपविभागात भूसंपादनाचे १४५ प्रकरण प्रलंबीत आहेत. नव्या कायद्यातील किचकट अटी व अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे भूसंपादनाची कार्यवाही थंडबस्त्यात असल्याने सिंचन प्रकल्पाच्या किमंती वाढणार असल्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने म्हटले आहे. शासनाने नव्या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे निर्देश दिले आहे. याबाबत सर्व सूचना व नियमावली ठरवून देण्यात आली. भूसंपादनाची कार्यवाही करण्याचे अधिकार संबधीत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. महसूल खात्याकडून कार्यवाही होण्यासाठी भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ पासून लागू केला. परंतु, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून नव्या कायद्यानुसार कार्यवाही होत नसल्याने विविध प्रकल्पाना जमीनी मिळण्यात अडचणी येत आहेत. भूसंपादनाच्या अडचणींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बेंडारा मध्यम प्रकल्प, पळसगाव आमडी टोमटा उपसा सिंचन योजना, लाल नाला प्रकल्प व उपसा सिंचन योजना आदी सिंचन प्रकल्पाची कामे रखडली आहेत. तर अनेक सिंचन प्रकल्प वनकायद्याच्या जाचक धोरणांमुळे अडकले आहेत. जिल्ह्याच्या एकुण ११.४२ लक्ष हेक्टर भौगोलीक क्षेत्रापैकी केवळ ४६.६७ टक्के हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. भूसंपादनाची कार्यवाही व वनकायद्याची अडचण दूर झाल्यास ८ हजार ४१४ हेक्टर क्षेत्राला सिंचन व्यवस्था होणार आहे. मात्र, शासन व प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने आजही अनेक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)