लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील काही गावांमध्ये उभारलेल्या डीपीचे दार उघडे असल्याने ते धोकादायक ठरत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, काही डीबी गावातील घराशेजारी, मैदानालगत आहे. याकडे मावितरण कपंनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आते तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. आता पावसाळा सुरु झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे. अनेकवेळा गावातील लगान बालक डीपीजवळ खेळत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वीज प्रवाहासाठी असलेल्या डीपीची डागडुजी, दुरुस्तीकरिता महावितरण कंपनीने पुढाकार घेऊन भविष्यातील धोका टाळावा, अशी मागणी केली जात आहे.दुरुस्तीसाठी टाळाटाळअनेकवेळा डीपीचे झाकण लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नाही. तर काही ठिकाणी डीपीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. असे असताना शहर तथा ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीपी कधी सुरळीत होणार, जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनी कामाला लागणार का,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे झाकण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.वीज देयकामुळे ग्राहक त्रस्तलॉकडाऊन काळातील तीन महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविले जात आहे. सदर देयक बघून अनेकांचे डोळे पांढरे होत आहे. गरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार मार्च ते मे असे तीन महिने घरीच होते. आता कोरोनासह या नव्या वीज देयकांचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे वीज देयके माफ करावेत, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
उघड्या डीपी ठरत आहे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST
महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आते तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. आता पावसाळा सुरु झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे.
उघड्या डीपी ठरत आहे धोकादायक
ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : लोकवस्ती भागात अप्रिय घटनेला जबाबदार कोण ?