शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

उघड्या डीपी ठरत आहे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आते तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. आता पावसाळा सुरु झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : लोकवस्ती भागात अप्रिय घटनेला जबाबदार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील काही गावांमध्ये उभारलेल्या डीपीचे दार उघडे असल्याने ते धोकादायक ठरत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, काही डीबी गावातील घराशेजारी, मैदानालगत आहे. याकडे मावितरण कपंनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आते तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. आता पावसाळा सुरु झाला असताना डीबीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे. अनेकवेळा गावातील लगान बालक डीपीजवळ खेळत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वीज प्रवाहासाठी असलेल्या डीपीची डागडुजी, दुरुस्तीकरिता महावितरण कंपनीने पुढाकार घेऊन भविष्यातील धोका टाळावा, अशी मागणी केली जात आहे.दुरुस्तीसाठी टाळाटाळअनेकवेळा डीपीचे झाकण लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नाही. तर काही ठिकाणी डीपीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. असे असताना शहर तथा ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीपी कधी सुरळीत होणार, जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनी कामाला लागणार का,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे झाकण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.वीज देयकामुळे ग्राहक त्रस्तलॉकडाऊन काळातील तीन महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविले जात आहे. सदर देयक बघून अनेकांचे डोळे पांढरे होत आहे. गरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार मार्च ते मे असे तीन महिने घरीच होते. आता कोरोनासह या नव्या वीज देयकांचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे वीज देयके माफ करावेत, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :electricityवीज