शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

८४ वर्षांपासून सावरगावात एकच गणपती

By admin | Updated: September 9, 2016 00:51 IST

गावातील विवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे.

गाव अस्सल राजकीय : मात्र उत्सवात एकीचे दर्शनघनश्याम नवघडे नागभीडगावातील विवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे. मात्र नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे ही संकल्पना ८४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशी ओळख असलेल्या या गावात ही संकल्पना राबविली जात असल्याने गावाचे कौतुक केले जात आहे.‘सार्वजनिक गणपती मंडळ’ असे या सावरगावच्या गणपती मंडळाचे नाव आहे. १९३२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. १९३२ ते २०१५ या ८४ वर्षाच्या कालावधीत या मंडळाचे केवळ तीन अध्यक्ष झाले, हे आणखी एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पहिले अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग बोरकर हे होते. ते जवळपास ३० वर्ष अध्यक्ष होते. नंतर रामकृष्ण चिरकुटा सहारे अध्यक्ष झाले. आता मोरेश्वर कुकसू ठिकरे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.खरेतर सावरगावची ओळख राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव म्हणून तालुक्यात आहे. चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात राजकीय कलगीतुरे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झडतात की त्याची चर्चा अख्ख्या तालुक्यात होते. निवडणुक कोणतीही असो, निवडणुक आली की दोन ध्रृवावर दोघे, अशी या गावाची विभागणी होऊन जाते. सावरगावची ग्रामसभा तर अनेकदा वादाचा विषय होत असते. अनेकदा पोलीस ठाण्यापर्यंत ती पोचली आहे.राजकीयदृष्ट्या सावरगावची अशी पार्श्वभूमी असली तरी गणपती उत्सवाच्या वेळी मात्र संपूर्ण सावरगाव एक होऊन जाते. गणपती उत्सव संपूर्ण गावाचा होऊन जातो. गावात राजकीय मतभेद कितीही आणि काहीही असोत, पण यावेळी या मतभेदांना मुळीच थारा नसतो. ते १० दिवस कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचारच केला जात नाही. शेवटचे दोन दिवस तर गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जातो. या दोन दिवसात कोणीही कामावर किंवा शेतावर जात नाही. शेवटच्या दिवशी गावात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. केवळ गावकरीच नाही तर पंचक्रोशीतील नागरिकही या महाप्रसादाचा लाभ घेत असतात.