शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा धानाचे एकरी उत्पन्न केवळ पाच पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:34 IST

यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले.

ठळक मुद्देउत्पादनात प्रचंड घट धानाला तीन हजार रूपये हमीभावाची मागणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. यावर्षी धान उत्पादनात प्रचंड घट आली असून एकरी १५ हजार रूपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात पाच हजाराचे उत्पन्न आल्याने शेतकरी कमालीचा हादरला आहे.बल्लारपूर तालुक्यात मानोरा कवडजई, किन्ही, कोेर्टी, पळसगाव, आमडी, कळमना, दहेली, बामणी, आसेगाव, गिलबिली, मोहाडी तुकूम, इटोली व कोठारीसह अनेक गावात हजारो हेक्टरवर धानपिक घेतल्या जाते. या भागात धान पीक प्रमुख असून मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जिवारी आला आहे. शेतीसाठी विविध बँका, सहकारी सोसायट्या व सावकारी खाजगी कर्जाची उचल केल्याने कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. त्यात उत्पन्नात कमालीची घट आल्याने मुलांचे शिक्षण, लग्न आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पीक हाती येण्याच्यावेळी भातावर मावा-तुडतुडा, करपा, खोडकिडा, गेवरा आदी रोगाने धानपिकांवर आक्रमण केले व उभे पीक नष्ट झाले. यामुळे शासनाने भरपाई देण्याची मागणी आहे.

हेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत द्यानिसर्गाच्या लहरीपणामुळे व धानपिकांवर आलेल्या विविध रोगाने त्याचा गंभीर परिणाम उत्पादनावर झाला. अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची मदत शासनाने जाहीर करण्याची मागणी कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यानेच धानपिक जाळलेकोठारीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या बामणी येथील तरुण शेतकरी शैलेश रामटेके याने जंगली जनावरांच्या त्रासामुळे व धानावर आलेल्या विविध रोगामुळे त्रस्त होवून उभे धानपिक जाळून टाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती