शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षित युवकांनाच व्हायचे गावचे कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

○ शिक्षित युवकांनाच व्हायचे गावचे कारभारी... ○ भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या ...

○ शिक्षित युवकांनाच व्हायचे गावचे कारभारी...

○ भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच गावातील लगबग हालचाली ना वेग आला आहे.कुचना-थोराणा,माजरी, मणगाव,पाटाळा-राळेगाव ,नागलोन,चालबर्डी या परिसरात आता हालचालींना वेग आला आहे..यासाठी उमेदवार निवडण्यापासून तर कागदपत्रे तयार करण्याची भाऊगर्दी वाढली आहे..तर प्रस्थपित ग्रामपंचायती वर आपलाच दबदबा असावा यासाठी राजकीय डावपेच कसे आखायचे याची तयारी चालु झाली आहे..

○ या वर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तरुण वर्ग विशेषतः पुढे येताना दिसत आहे.....भास्करराव पेरे पाटील यांचे आदर्श ग्राम व त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षित,तरुण,तसेच ग्रामविकासची आस असणारे ,आपल्याही गावात आदर्श परिवर्तन करण्यासाठी धडपडणारे युवक यावेळी निवडणुकीत इच्छुक असल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र तरी वाटत आहे...

○ असे असले तरी निवडणुका होताना आपापसात वैर नको ,निवडणुकीनंतर सर्व हेवे दावे विसरून सर्वांनी शाश्वत गावसेवेसाठी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे..

○ग्रामीण भागातील शेती व्यवसाय प्रमुख असल्याने शेतकऱ्यांसाठी वर्धा नदी, शिरणा नदी यासारख्या नद्यांवर जर नंदोरीसारखी मोठं मोठे बंधारे बांधण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सामूहिक प्रयत्न केल्यास व लोकप्रतिनिधींना तसे जागृत केल्यास जे क्षेत्र ड्राय झोन साठी परिचित आहे त्या क्षेत्रात कायमस्वरूपी पाण्याची उपाययोजना होऊन भविष्यात बागायती शेती आणि शेतीशी निगडित उद्योग झाल्यास येणाऱ्या दिवसात युवकांना सुद्धा रोजगाराच्या समस्या सुद्धा भेडसावणार नाही.

○तसेच हा परिसर म्हणजे जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून असल्याने अवैध धंदे ज्यात दारू,सट्टा, कोंबडबाजार ,रेतीतस्करी सुद्धा मोठ्या प्रमानत चालत असल्याने युवक वर्गात व्यसणाचे प्रमाण वाढून समाजविघातक कृत्याला चालना मिळते तर याच्या विरोधात निवडणुकातील मुद्दा झाल्यास बदलाची नांदी लागायला वेळ लागणार नाही..

○मात्र काहीही झाले तरी निवडणुकांमुळे गावचे गावपण आणि गावातील आपापसात असणारा गोडवा,आपुलकी,प्रेम जाता कामा नये..

○((कपिल रांगणकर तरुण मतदार थोराना.

-- कोरोना मुळे रोजगार गेल्याने परगावी स्थलांतर करण्यापेक्षा ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असल्याने आपले गाव परिपूर्ण करण्याच्या योजना गावातच राबवून रोजगार पूर्ण गाव करण्याची धडपड .

-- गट शेतीच्या माध्यमातून गावातच रोजगार निर्माण करून एकमेकांच्या सहकार्याने

आपलेच गाव स्वयंपूर्ण बनविण्याची महत्वाकांक्षा ..))