शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ४९ टक्के कुटुंबाचे ‘कल्याण’

By admin | Updated: December 22, 2016 01:39 IST

वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाकडून ‘राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम’ राबविला जात आहे.

आरोग्य विभागाकडून जनजागृती : गतवर्षीच्या तुलनेत अर्धे उद्दिष्ट अपूर्ण चंद्रपूर : वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाकडून ‘राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम’ राबविला जात आहे. या कार्यक्रमातर्गत दरवर्षी शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्याला उद्दीष्ट दिले जाते. मात्र २०१६-१७ या वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ ४९.६४ कुटुंबाचेच ‘कल्याण’ झाल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमातर्गत पाळणा लांबविण्याच्या तात्पुरत्या पध्दती आरोग्य विभागाने सांगितलेल्या आहेत. मात्र आजही अनेक कुटुंबामध्ये कमी अंतरात मुले जन्माला आलेली आढळून येतात. जिल्ह्यात नसबंदी शस्त्रक्रियागृह असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दरमहा टाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे व निश्चीत केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत योग्य लाभार्थ्यांना प्रवृत्त केले जाते व त्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर मोबदलाही दिला जातो. या कार्यक्रमातर्गत २०१६-१७ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला ११ हजार ९९८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ५ हजार ९५६ शस्त्रक्रिया झाल्या असून याची टक्केवारी ४९.६४ एवढी आहे. गतवर्षी जिल्ह्याने शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण केले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात असून यावर्षीचे उद्दीष्टही पूर्ण होईल, असा आशावाद आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. कमी वयात लग्न, मुलगाच हवा असा अट्टाहास, दोन मुलांमधील कमी अंतर इत्यादी बाबींवर खास आरोग्य शिक्षणाद्वारे जनजागृती केली जात आहे. यासाठी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून काम सुरू आहे. राज्य शासनाने ९ मे २००० च्या शासन निर्णयानुसार ‘छोटे कुटुंब’ या संकल्पनेचा स्विकार केलेला असून या कार्यक्रमानुसार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्यांला विशेष सवलतीही दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे उद्दीष्ट लवकरच पूर्ण होईल, अशी आशा जिल्हा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी) अशासकीय स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्त्वाची कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येतो. स्थानिक व स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन लाभार्थ्यांत जनजागृती करतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्थांना आर्थिक सहाय्य सहाय्यक अनुदानाच्या स्वरुपात दिले जाते. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नागरी आरोग्य केंद्र, नागरी कुटुंब कल्याण केंद्र, सहायक परिचारीका प्रसाविका प्रशिक्षण केंद्रात या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या संस्था महानगरपालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत.