शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

केवळ ४८ टक्के पेरणी

By admin | Updated: July 17, 2017 00:33 IST

जुलै महिना अर्धा संपला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

कृषी विभागाचा अहवाल : समाधानकारक पावसाची प्रतीक्षाचलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुलै महिना अर्धा संपला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेकांची पेरणीची कामे खोळंबली असून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ४८ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. कृषी विभागाने यावर्षी चार लाख ७६ हजार ३०० हेक्टरवर खरीप पीक पेरणीचे नियोजन केले होते. शेतकऱ्यांना बियाणे व खतासाठी अडचण निर्माण होवू नये, यासाठी बियाणे उपलब्ध करून देत खताचे आवंटन मंजूर करून घेतले. मात्र ऐन पेरणीच्या तोंडावर पावसाने दगा दिला. ज्या शेतकऱ्यांनी धुळ पेरणी केली त्यांचे बियाणे पावसाअभावी उगवलेच नाही. त्यामुळे त्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. अशातच अद्यापही जिल्ह्यात समाधानकार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत केवळ ४८.३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११३५ मिमी आहे. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २४८.३४ मिमी पाऊस झाला आहे. सध्या पेरणीची कामे जोमाने सुरू असून चार पुढील आठ ते दहा दिवसांत ८० ते ९० टक्के पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पेरणीचे ४ लाख ३८ हजार २०२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून ११ जुलैपर्यंत २ लाख ११ हजार ८३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सोयाबीन १ लाख ४० हजार ३८८ हेक्टर क्षेत्रापैकी ५५ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली असून कापूस, धान आदी पिकांची पेरणी केवळ ५० टक्के झाली आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.