शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

दहावीतही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देटक्का घसरला : जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली. त्या मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४६४ शाळांमधून ३१ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३१ हजार ८०८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ८९० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. १० हजार ५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १० हजार ६३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ५०९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात पाचव्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ८०० मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १६ हजार ६८२ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ७५६ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.४६ आहे.यासोबतच एकूण १५ हजार १७८ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १५ हजार १२६ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ३२८ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८८.११ आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली.पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ५१.२७ टक्केदहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ५१.२७ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील दोन हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी एक हजार ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५१.२७ आहे. पुरर्परीक्षार्थ्यांमध्ये चार विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.५० शाळांचा निकाल शंभर टक्केयंदा जिल्ह्याच्या निकालाची टक्क़ेवारी घसरली असली तरी शाळांचा निकाल मात्र चांगला लागला आहे. जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८