शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देटक्का घसरला : जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली. त्या मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४६४ शाळांमधून ३१ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३१ हजार ८०८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ८९० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. १० हजार ५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १० हजार ६३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ५०९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात पाचव्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ८०० मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १६ हजार ६८२ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ७५६ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.४६ आहे.यासोबतच एकूण १५ हजार १७८ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १५ हजार १२६ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ३२८ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८८.११ आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली.पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ५१.२७ टक्केदहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ५१.२७ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील दोन हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी एक हजार ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५१.२७ आहे. पुरर्परीक्षार्थ्यांमध्ये चार विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.५० शाळांचा निकाल शंभर टक्केयंदा जिल्ह्याच्या निकालाची टक्क़ेवारी घसरली असली तरी शाळांचा निकाल मात्र चांगला लागला आहे. जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८