शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

एटीएम क्रमांक व पासवर्ड सहाय्याने आॅनलाईन फसवणूक करणारा जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:27 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : एटीएम क्रमांक व पासवर्डच्या आधारे आॅनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात चंद्रपूर सायबर सेलच्या पथकाला यश आले आहे. ही टोळी उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा प्रकारची फसवणूक झाल्यानंतर उघडकीस आलेले हे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याची अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर ...

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील तरुणांची टोळी देशात सक्रीयदर तीन महिन्यांनी पीन बदलण्याची गरज

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : एटीएम क्रमांक व पासवर्डच्या आधारे आॅनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात चंद्रपूर सायबर सेलच्या पथकाला यश आले आहे. ही टोळी उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा प्रकारची फसवणूक झाल्यानंतर उघडकीस आलेले हे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याची अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर ठाण्यात त्रिरत्ना नारायण मेश्राम रा. नगीनाबाग या महिलेने बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून १५ हजार ९४५ रुपये लंपास झाल्याची तक्रार केली होती. भ्रमणध्वनीवरून पासवर्ड विचारून फसवणुकीचा प्रकार नसल्याने पोलिसांनाही तपास करणे अडचणीचे होते. मात्र सायबर सेलकडे प्रकरण वळते केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मुंढे व त्यांच्या पथकाने सदर खात्यातून झालेल्या व्यवहाराचे तांत्रिक विश्लेषण करून पुरावे गोळा केले. यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील अनुपार मठिया येथील असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने उत्तर प्रदेशातील मुमदाबाद पोलिसांच्या सहकाऱ्याने टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. चंद्रपूरात या प्रकारचे तब्बल नऊ गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांनी झोप उडाली होती.अशी होते पासवर्डची चोरीअनुपार मठिया येथील तरुणांची टोळी देशात नातेवाईक असलेल्या गावांमध्ये जावून एक ते दीड महिना मुक्काम करतात. यानंतर त्या परिसरातील एटीएमवर जाऊन एटीएमधारक पैसे काढण्यासाठी आल्यानंतर मोठ्या शिताफीने एटीएमचा १६ अंकी क्रमांक, एक्सपायरी डेट, नाव व पासवर्ड मिळवितात. त्यानंतर आपल्या गावाला परत गेल्यानंतर त्या आधारे ग्राहकाच्या खात्यातून आॅनलाईन खरेदी वा रक्कम गहाळ करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. अशा प्रकारचा हा पहिला गुन्हा महाराष्ट्रात निष्पन्न झाला असल्याचे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सांगितले.दर तीन महिन्यांनी पीन बदलण्याची गरजबँक व्यवहार, एटीएम व्यवहार, आॅनलाईन शॉपिंग, दुकानातील स्वाईप कार्ड शॉपिंग, करताना काळजीपूर्वक व्यवहार करावा. तसेच फोनद्वारे कोणालाही एटीएमचा १६ अंकी क्रमांक, सीवीवी क्रमांक आणि नंतर ओटीपी देण्यात येऊ नये. एटीएम कार्डचे पासवर्ड बदलले नसेल तर त्वरीत बदलावे. तसेच तीन महिन्यांनी हे पीन बदलत राहावे, तसेच एमटीएमचा वापर करतानाही आपली माहिती कोणाला दिसू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही यावेळी पोलीस अधीक्षक ठाकर यांनी केले.

टॅग्स :Crimeगुन्हा