शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३३२ गावात मॅजिक बसचे ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

राजू गेडाम मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षापासून प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन ...

राजू गेडाम

मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षापासून प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण असले तरी अभ्यासाव्यतिरीक्त शिक्षणाने मौलिक विचार करायला भाग पाडले जाते. हेच हेरून मॅजिक बस या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील विविध सामजिक, बौधिक विषयावर विविध उपक्रमातून शिक्षण दिले जात आहे. सदर उपक्रमामुळे विद्यार्थीवर्गात उत्साह दिसून येत आहे. ३३२ गावात विद्यार्थ्याच्या बौद्धिकतेला चालना देण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने कोरोना काळात पालकवर्गानी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी इत्यादी तालुक्यातील शाळांमध्ये स्केल कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ३८,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे शिक्षण व जीवन कौशल्य विकास हा कार्यक्रम मागील दोन वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तेव्हापासून मॅजिक बस संस्थेच्यावतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. त्यामागील मुख्य हेतू असा की विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजावित व शाळेतील मुख्य विषयांमध्ये मुख्यतः भाषा, गणित, विज्ञान इत्यादी विषयांच्या अध्ययनात खंड पडू नये. या हेतूने मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी व गावातील समुदाय समन्वयक सतत्याने प्रयत्नशील आहेत.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेतील संपूर्ण तालुक्याचे तालुका समन्वयक निकिता ठेंगणे, योगेश मोरे, सुपडा वानखेडे, नितेश मालेकर, हिराचंद रोहनकर, तसेच संपूर्ण ०९ तालुक्यातील ३० शाळा सहायक अधिकारी व गावातील ३३२ समुदाय समन्वयक हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येते.

बॉक्स

या बाबी शिकविल्या जातात

विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा तयार करायला सांगणे, प्रत्येक सत्रानंतर गृहपाठ देणे, पाढे पाठांतर करायला सांगणे, गणितीय क्रिया सोडवणे,सूत्र पाठांतर करून घेणे आणि विद्यार्थी या सगळ्या गोष्टी करत आहेत की नाही, याचा फोन द्वारे पाठपुरावा घेणे, पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा करणे इत्यादी या अभिनव उपक्रमाचे महत्वपूर्ण घटक आहे. या सगळ्या बाबीना विद्यार्थी व पालक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे.वरील कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील ०९ तालुक्यातील ३३२ गावांमध्ये ३८,००० विद्यार्थ्यांसोबत राबविण्यात येत आहे.