शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जिल्ह्यातील ३३२ गावांत मॅजिक बसचे ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST

राजू गेडाम मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षांपासून प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन ...

राजू गेडाम

मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षांपासून प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण असले, तरी अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षणाने मौलिक विचार करायला भाग पाडले जाते. हेच हेरून मॅजिक बस या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील विविध सामाजिक, बौध्दिक विषयांवर विविध उपक्रमांतून शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थीवर्गात उत्साह दिसून येत आहे. ३३२ गावांत विद्यार्थ्याच्या बौद्धिकतेला चालना देण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने कोरोना काळात पालकवर्गानी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी आदी तालुक्यांतील शाळांमध्ये स्केल कार्यक्रमाअंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ३८,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे ‘शिक्षण व जीवन कौशल्य विकास’ हा कार्यक्रम मागील दोन वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तेव्हापासून मॅजिक बस संस्थेच्यावतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. त्यामागील मुख्य हेतू असा की, विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजावित व शाळेतील मुख्य विषयांमध्ये मुख्यतः भाषा, गणित, विज्ञान आदी विषयांच्या अध्ययनात खंड पडू नये, या हेतूने मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी व गावातील समुदाय समन्वयक सतत्याने प्रयत्नशील आहेत.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेतील संपूर्ण तालुक्याचे तालुका समन्वयक निकिता ठेंगणे, योगेश मोरे, सुपडा वानखेडे, नीतेश मालेकर, हिराचंद रोहनकर, तसेच संपूर्ण ०९ तालुक्यांतील ३० शाळा सहायक अधिकारी व गावातील ३३२ समुदाय समन्वयक हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येते.

बॉक्स

या बाबी शिकविल्या जातात

विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा तयार करायला सांगणे, प्रत्येक सत्रानंतर गृहपाठ देणे, पाढे पाठांतर करायला सांगणे, गणितीय क्रिया सोडवणे, सूत्र पाठांतर करून घेणे आणि विद्यार्थी या सगळ्या गोष्टी करत आहेत की नाही, याचा फोनद्वारे पाठपुरावा घेणे, पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा करणे आदी या अभिनव उपक्रमाचे महत्त्वपूर्ण घटक आहे. या सगळ्या बाबींना विद्यार्थी व पालक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. वरील कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील ०९ तालुक्यांतील ३३२ गावांमध्ये ३८,००० विद्यार्थ्यांसोबत राबविण्यात येत आहे.