शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३३२ गावांत मॅजिक बसचे ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST

राजू गेडाम मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षांपासून प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन ...

राजू गेडाम

मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षांपासून प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण असले, तरी अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षणाने मौलिक विचार करायला भाग पाडले जाते. हेच हेरून मॅजिक बस या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील विविध सामाजिक, बौध्दिक विषयांवर विविध उपक्रमांतून शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थीवर्गात उत्साह दिसून येत आहे. ३३२ गावांत विद्यार्थ्याच्या बौद्धिकतेला चालना देण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने कोरोना काळात पालकवर्गानी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी आदी तालुक्यांतील शाळांमध्ये स्केल कार्यक्रमाअंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ३८,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे ‘शिक्षण व जीवन कौशल्य विकास’ हा कार्यक्रम मागील दोन वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तेव्हापासून मॅजिक बस संस्थेच्यावतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. त्यामागील मुख्य हेतू असा की, विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजावित व शाळेतील मुख्य विषयांमध्ये मुख्यतः भाषा, गणित, विज्ञान आदी विषयांच्या अध्ययनात खंड पडू नये, या हेतूने मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी व गावातील समुदाय समन्वयक सतत्याने प्रयत्नशील आहेत.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेतील संपूर्ण तालुक्याचे तालुका समन्वयक निकिता ठेंगणे, योगेश मोरे, सुपडा वानखेडे, नीतेश मालेकर, हिराचंद रोहनकर, तसेच संपूर्ण ०९ तालुक्यांतील ३० शाळा सहायक अधिकारी व गावातील ३३२ समुदाय समन्वयक हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येते.

बॉक्स

या बाबी शिकविल्या जातात

विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा तयार करायला सांगणे, प्रत्येक सत्रानंतर गृहपाठ देणे, पाढे पाठांतर करायला सांगणे, गणितीय क्रिया सोडवणे, सूत्र पाठांतर करून घेणे आणि विद्यार्थी या सगळ्या गोष्टी करत आहेत की नाही, याचा फोनद्वारे पाठपुरावा घेणे, पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा करणे आदी या अभिनव उपक्रमाचे महत्त्वपूर्ण घटक आहे. या सगळ्या बाबींना विद्यार्थी व पालक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. वरील कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील ०९ तालुक्यांतील ३३२ गावांमध्ये ३८,००० विद्यार्थ्यांसोबत राबविण्यात येत आहे.