शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शंभर वर्षांचा ‘तो’ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:22 IST

राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे.

ठळक मुद्देनवीन पुलाची गरज : हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्रालयाचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या ब्रिटीशकालीन रेल्वे पुलामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून लक्ष वेधल्यामुळे लवकरच रेल्वे प्रशासन नवीन पुलाच्या दिशेने पाऊल उचलण्याची शक्यता आहे.ब्रिटीश राजवटीत हा पूल तयार आला असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल वर्षभराने याच पुलावरुन सैनिक पाठवून राजुरा तालुका निजामांच्या राजवटीमधून मुक्त केला. एकाच पिल्लरवर हा पूल तयार करण्यात आला असून अनेक ठिकाणी भेगा पडल्यामुळे यावर करोडो रुपये खर्च करुन डागडूजी करण्यात आली. रेल्वेचे डब्बे वाढले, वेग वाढला. मागील शंभर वर्षापासून निरंतरपणे दररोज अनेक रेल्वेगाड्या जात असतात. अतिशय कमी वेगात या पुलावरुन गाड्या चालविण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. या मार्गावर चेन्नई - दिल्ली मार्गावरील सर्वच प्रमुख गाड्या धावत असून रेल्वेपुलाजवळील पिल्लर लगतचे दगड बरोबर नसून नट-बोल्ट जंगलेले आहे. या पुलावरुन ये-जा करणाºया १२० च्या जवळपास प्रवासी रेल्वे गाड्या धावत असून ७५ मालगाड्या धावतात. चेन्नई- दिल्ली मार्गावरील सर्व गाड्या जुन्याच रेल्वे पुलावरुन धावत असल्यामुळे केव्हा अपघात घडून येईल, याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच बल्लारपूर रेल्वे जंक्शन असून शेकडो गाड्यामधील रेल्वे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या धोकादायक पुलाचे काम तातडीने हाती घेण्याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.