शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

शंभर वर्षांचा ‘तो’ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:22 IST

राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे.

ठळक मुद्देनवीन पुलाची गरज : हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्रालयाचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या ब्रिटीशकालीन रेल्वे पुलामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून लक्ष वेधल्यामुळे लवकरच रेल्वे प्रशासन नवीन पुलाच्या दिशेने पाऊल उचलण्याची शक्यता आहे.ब्रिटीश राजवटीत हा पूल तयार आला असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल वर्षभराने याच पुलावरुन सैनिक पाठवून राजुरा तालुका निजामांच्या राजवटीमधून मुक्त केला. एकाच पिल्लरवर हा पूल तयार करण्यात आला असून अनेक ठिकाणी भेगा पडल्यामुळे यावर करोडो रुपये खर्च करुन डागडूजी करण्यात आली. रेल्वेचे डब्बे वाढले, वेग वाढला. मागील शंभर वर्षापासून निरंतरपणे दररोज अनेक रेल्वेगाड्या जात असतात. अतिशय कमी वेगात या पुलावरुन गाड्या चालविण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. या मार्गावर चेन्नई - दिल्ली मार्गावरील सर्वच प्रमुख गाड्या धावत असून रेल्वेपुलाजवळील पिल्लर लगतचे दगड बरोबर नसून नट-बोल्ट जंगलेले आहे. या पुलावरुन ये-जा करणाºया १२० च्या जवळपास प्रवासी रेल्वे गाड्या धावत असून ७५ मालगाड्या धावतात. चेन्नई- दिल्ली मार्गावरील सर्व गाड्या जुन्याच रेल्वे पुलावरुन धावत असल्यामुळे केव्हा अपघात घडून येईल, याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच बल्लारपूर रेल्वे जंक्शन असून शेकडो गाड्यामधील रेल्वे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या धोकादायक पुलाचे काम तातडीने हाती घेण्याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.