शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वन अकादमीत आपत्ती निवारण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:56 IST

येथील वन प्रबोधिनी संकूल परिसरात लवकरच वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी स्वतंत्र इमारत, मूलभूत संरचनेसह बांधकाम करण्याबाबतच्या सात कोटी २३ लाख २७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सदर केंद्र आशिया खंडातील सर्वोत्तम केंद्र ठरेल

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील वन प्रबोधिनी संकूल परिसरात लवकरच वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी स्वतंत्र इमारत, मूलभूत संरचनेसह बांधकाम करण्याबाबतच्या सात कोटी २३ लाख २७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या महसूल व वनविभागाने गुरुवारी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, हे विशेष.केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण विषयक योजनेची महाराष्ट्रातदेखील अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर वन प्रबोधिनी संकूल परिसरात वन वणवा व नैसर्र्गिक आपत्ती निवारण केंद्रासह स्वतंत्र इमारत, मुलभूत संरचनेसह बांधकाम करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्याअनुषंगाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन व प्रशिक्षण) यांनी शासनाला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या केंद्राबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा, अग्नी सुरक्षा प्रशिक्षण महाविद्यालय नागपूर आदींसह या केंद्राचे स्वरूप निश्चित करण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय बैठक घेतली होती. वनविभागाचे नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र हे ज्ञान केंद्र झाले पाहिजे, तेथे नैसर्गिक आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण, यासंबंधीचे संशोधने झाले पाहिजे.या केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणारे प्रशिक्षण वर्ग, इतर कोर्सेस याचे एक उत्तम मॉडेल तयार करण्यात यावे व त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान अत्याधुनिक व परिपूर्ण असावे तसेच त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षीत मनुष्यबळाचा विचार केला जावा, अशी भूमिका ना. मुनगंटीवार यांनी या बैठकीदरम्यान मांडली होती. दरम्यान, हे केंद्र देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वोत्तम केंद्र ठरेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.केंद्रात होणार ही कामेया केंद्रात नियमित प्रशिक्षण, पूर, वन वणवे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे. एखादा बिबट विहिरीत पडला किंवा गावातील एखाद्या घरात घुसला तर त्याची सुटका कशी करायची, या परिस्थितीत लोकांनी नेमके कसे वागायचे, याचादेखील त्यात समावेश असणार आहे. वातावरणीय बदलामुळे वनातील काही वृक्ष प्रजाती, वन्यजीव प्रजाती नाहिशा होत आहेत, त्याचे रक्षण कसे करायचे, याचादेखील या आपत्ती निवारण केंद्रात अभ्यास करता यावा, यादृष्टीने या केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार