शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी बैलगाडीतून काढली विद्यार्थ्यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2023 20:00 IST

Chandrapur News शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे बैलबंडीवर बॅण्ड पथकाच्या साहाय्याने वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर कुठे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

चंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपून शुक्रवारी जिल्ह्यातील दोन हजार ४७२ शाळेची पहिली घंटा वाजली. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. दोन महिने शांत असलेला शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे बैलबंडीवर बॅण्ड पथकाच्या साहाय्याने वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर कुठे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

दरवर्षी शाळा २६ जून रोजी सुरू व्हायची. मात्र यंदा पहिल्यांदाच शिक्षण विभागाने ३० जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उन्हाळी सुट्या संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर शुक्रवारी शाळेची पहिली घंटा वाजली. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमविताना दिसून आले. 

पहाटेच रिक्षावाला काका घरीशाळेच्या पहिल्याच दिवशी रिक्षावाल्या काकांचेही काम सुरू झाले. सकाळी साडेसहा वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा धावू लागल्या होत्या. विद्यार्थीही रिक्षावाल्या काकांची वाट पाहत, सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते. बऱ्याच दिवसांनंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता.

कुठे हसू तर कुठे आसू

शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत मित्र मिळाले म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. तर नवप्रवेशीत मुलांना आपल्या आईवडिलांपासून काही वेळ दूर राहावे लागत होते. म्हणून डोळ्यात आसू दिसून येत होते. आईवडिलांनी समजूत घालून मुलांना शाळेत पाठवल्याचे दिसून आले. 

विद्यार्थ्यांचे जंगी स्वागतजिल्हा परिषद शाळा शुक्रवारपासून सुरू झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवही साजरा केला जाणार आहे. विशेषत: अनेक शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

टॅग्स :Schoolशाळा