शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

निराधार योजनांच्या लाभासाठी वृद्ध झाले ‘निराधार’

By admin | Updated: October 28, 2014 22:54 IST

गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परित्यक्त्या, विधवा व अपगांना अर्थसाहाय्य देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु या निराधार व वृद्धांना

चंद्रपूर : गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परित्यक्त्या, विधवा व अपगांना अर्थसाहाय्य देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु या निराधार व वृद्धांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालय व बँकांचे उंबरठे झिजवून सुद्धा लाभ मिळत नाही. निराधार योजनेचे वृध्दच निराधार झाल्याचे चित्र तहसील कार्यालयात दिसून येत आहे. शासनाने निराधार दुर्बल घटकांना तसेच निराधार वयोवृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विशेष साहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना व आम आदमी विमा योजना राबवित आहे. परंतु, या लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची बँकाकडूनच हेळसांड होत आहे. काही ठिकाणी निराधारांना अपमानास्पद वागणूकसुद्धा मिळते तर काही बँकामध्ये निराधारांचे खाते काढण्यास टाळाटाळ जात असल्याचा प्रकार सुरु आहे. एखाद्या पात्र लाभार्थ्याला लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवून सुद्धा लाभ मिळत नाही तर बोगस लाभार्थंना एजंटमार्फत तत्काळ लाभ दिला जात असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. प्रत्येक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे निराधारांचे आर्थिक शोषण होत आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात निराधार समित्यांच्या बैठका होत नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याची स्थिती आहे. तसेच निराधार योजनांच्या कार्यालयांनासुद्धा रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.जिल्हास्तरीय कार्यालयात निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त असून तालुका स्तरावरील कार्यालयातसुद्धा कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे निराधार योजनेच्या कार्यालयात माहितीचा अभाव असून निराधार नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. विशेष साहाय्य योजनेच्या एकूण सात योजनांपैकी बऱ्याच योजनांची माहिती ग्रामीण भागातील निराधारांना होत नसल्याने त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.अनेक तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी या योजनांकडे लक्ष देत नसल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली दलालांकडून लाभार्थ्यांची लूट केली जात आहे. याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून लाभार्थ्यांची सुरू असलेली ही लूट बिनबोभाट आजही सुरूच आहे. गरीब लाभार्थ्यांकडे आधीच पैसे नसतानाही या दलालांकडून लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे लुटले जात आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी व गरीब गरजूंना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)