शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

घरकुलासाठी वृद्धाचा शासनदरबारी संघर्ष

By admin | Updated: October 1, 2015 01:20 IST

निराधार व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने घरकूल योजना सुरू केली.

स्वस्त धान्यही नाही : घरकुलाच्या यादीमध्ये श्रीमंतांची नावेविनेदचंद्र मांडवकर नंदोरीनिराधार व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने घरकूल योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला मजबुत घर मिळेल, हा उद्देश होता. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या दुुर्लक्षितपणामुळे अनेकांना हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागत आहे. येथील साधूजी उर्फ निलकंठ पांडुरंग जौंजाळ हा वयोवृध्द पडक्या घरात राहून शासनदरबारी घरकुलासाठी संघर्ष करीत आहे.नंदोरी येथील घरकुल योजनेच्या यादीमध्ये ९४ लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी काही खरोखरच लाभार्थी आहेत व काही बोगस व पुढाऱ्यांच्या मर्जीतील आहेत. काहीच्या नावे जमीन-जुमले आहेत. आठ ते दहा एकर शेतजमिनी स्वगावी व परगावी आहे. सातबाऱ्यावर जमिनीच्या नोंदीसुद्धा आहेत. काहींची आधीचीच भक्कम स्लॅबची घरे आहेत. अशांचाही घरकुलच्या यादीमध्ये समावेश आहे. याउलट योग्य लाभार्थीची नावे मात्र यादीमध्ये नाहीत. हे लाभार्थी मागील दहा ते बारा वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. भर पावसाळ्यात बिछाना गुंडाळून, तुटक्या खाटेवर बसून संबंध रात्र जागतात, पावसाने गळणाऱ्या जागी घरभर भांडे मांडतात, ज्यांच्या मोडकळीस आलेल्या घराला दारेसुद्धा नाहीत. उपजिविकेचे साधन असलेली दुभती म्हैस विकूनू घराची थोडीफार डागडुजी करीत अनेकजण घरकुलाची वाट पाहात बसले आहेत. येथील साधूजी उर्फ निलकंठ पांडुरंग जौंजाळ यांची तर व्यथाच वेगळी आहे. खरे लाभार्थी असतानाही ते मागील अनेक वर्षांपासून घरकुलच्या लाभापासून वंचित आहे. त्यांना साधे अन्न सुरक्षा योजनेतून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळत नाही. दुसरीकडे बोगस लाभार्थी पुन्हा श्रीमंत होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य लाभार्थीची निवड करावी व शासनाची होणारी दिशाभूल थांबवावी, अशी मागणी या लाभार्थ्यांने ‘लोकमत’शी बोलताना केली. वंचित लाभार्थी साधूजी जौंजाळ म्हणतात, २६ जानेवारी २०१५ रोजी आमसभेतून त्यांचे नाव घरकुल यादीमध्ये व दारिद्र्य रेषा योजनेमध्ये सर्वानुमते ठराव घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. आमसभेच्या ठरावात गावाने आपली बाजू लावून धरली होती. या ठरावाने आपणास घरकुल मिळेल, आपण खरा लाभार्थी असल्याने, अधिकारी आपले दु:ख समजून घेईल, अशी आशा होती. पण आपले नाव घरकुल यादीतून व दारिद्र्यरेषेखालून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आजही त्यांना पडक्या घरात, तुटक्या खाटेवर पावसात भिजत आयुष्य कंठावे लागत आहे. आपली व्यथा सांगताना जौंजाळ यांनी अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे घरकुल यादीत व दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट केली. आपण खरा लाभार्थी असूनही आपले नाव योजनेत नाही. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व्हे केला. यातून आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप जौंजाळ यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आहे.