शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तेलवासा कोळसा खाण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:39 IST

वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही.

ठळक मुद्देकामगार मृत्यूप्रकरण : बेंचेसअभावी खाण झाली होती विहिरीसारखी

राजेश रेवते।लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही. यासंदर्भात वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे तेलवासा खाणीला बंद करण्यात आले आहे.तेलवासा कोळसा खाणीत कोळसा काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग करण्यात आली. वास्तविक, ब्लास्टिंगचे काम अंधारात न करता दुपारीच केले जाणे बंधनकारक आहे. मात्र ब्लास्टिंग अधिकारी, सुरक्षा अधिकारी व उपक्षेत्रीय प्रबंधक यांनी नियमबाह्यरित्या सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग केली. अंधारात ब्लास्टिंग केल्यामुळे तिथे कोळसा पूर्णपणे खाली कोसळला की नाही, याची शाहनिशा करणे कठीण असते. घटनेच्या दिवसीही याबाबत शहानिशा झाली नव्हती, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. डोजर आॅपरेटर निरज झा जे डोजर मशीन चालवत होते, ते मशीन कालबाह्य झालेली होती, अशी माहिती आहे.विशेष म्हणजे, तेलवासा कोळसा खदान हे सध्या विहिरीसारखी खोल आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिथे बेंच बनवायला हवे होते. ज्यामुळे खाली काम करीत असताना वरून माती कोसळत नाही. मात्र या ठिकाणी बेंचेस बनविण्यात आलेले नाही.कोल इंडियाचे डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा), डायरेक्टर आॅफ टेक्नीकल आणि वेकोलि माजरीचे संपूर्ण अधिकारी यांना ही खाण कोळसा काढण्यासाठी सुरक्षित नाही, हे चांगले ठाऊक होते. तरीही या खाणीत कोळसा काढणे सुरुच ठेवण्यात आले होते. या तेलवासा खाणीला मागेच बंद केले असते, तर यात कामगार निरजू झा याचा जीव गेला नसता.डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा) अशोककुमार व डायरेक्टर आॅफ टेक्निकल लक्ष्मी नारायण यांनी आपल्या दौºयात अनेकदा या खाणीची पाहणी केली होती. तरीही खाण सुरूच होती. आता कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशीदेखील हेच अधिकारी करीत आहे. त्यामुळे एखाद्या अधिकाºयावर निलंबनाची कार्यवाही करून प्रकरण दडपले जाण्याची शक्यताही अधिक आहे. असे झाले तर घटनेला जबाबदार मुख्य अधिकारी अभय मिळेल.वेकोलि माजरी कामगारांच्या पाच कामगार संघटना असून या पाचही कामगार संघटनेचे नेता खाण सुरक्षा समितीमध्ये सदस्य आहेत. घटनेनंतर सुरक्षा समितीचे सदस्य माजरीच्या तेलवासा खाणीत येऊन पाहणी करून जात आहे. परंतु खाणीत बेंचेस का नाही, याबाबत कुणीही आक्षेप घेतलेला नाही, हे विशेष. पाचही कामगार संघटना चुप्पी साधून असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.