शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

तेलवासा कोळसा खाण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:39 IST

वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही.

ठळक मुद्देकामगार मृत्यूप्रकरण : बेंचेसअभावी खाण झाली होती विहिरीसारखी

राजेश रेवते।लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही. यासंदर्भात वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे तेलवासा खाणीला बंद करण्यात आले आहे.तेलवासा कोळसा खाणीत कोळसा काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग करण्यात आली. वास्तविक, ब्लास्टिंगचे काम अंधारात न करता दुपारीच केले जाणे बंधनकारक आहे. मात्र ब्लास्टिंग अधिकारी, सुरक्षा अधिकारी व उपक्षेत्रीय प्रबंधक यांनी नियमबाह्यरित्या सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग केली. अंधारात ब्लास्टिंग केल्यामुळे तिथे कोळसा पूर्णपणे खाली कोसळला की नाही, याची शाहनिशा करणे कठीण असते. घटनेच्या दिवसीही याबाबत शहानिशा झाली नव्हती, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. डोजर आॅपरेटर निरज झा जे डोजर मशीन चालवत होते, ते मशीन कालबाह्य झालेली होती, अशी माहिती आहे.विशेष म्हणजे, तेलवासा कोळसा खदान हे सध्या विहिरीसारखी खोल आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिथे बेंच बनवायला हवे होते. ज्यामुळे खाली काम करीत असताना वरून माती कोसळत नाही. मात्र या ठिकाणी बेंचेस बनविण्यात आलेले नाही.कोल इंडियाचे डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा), डायरेक्टर आॅफ टेक्नीकल आणि वेकोलि माजरीचे संपूर्ण अधिकारी यांना ही खाण कोळसा काढण्यासाठी सुरक्षित नाही, हे चांगले ठाऊक होते. तरीही या खाणीत कोळसा काढणे सुरुच ठेवण्यात आले होते. या तेलवासा खाणीला मागेच बंद केले असते, तर यात कामगार निरजू झा याचा जीव गेला नसता.डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा) अशोककुमार व डायरेक्टर आॅफ टेक्निकल लक्ष्मी नारायण यांनी आपल्या दौºयात अनेकदा या खाणीची पाहणी केली होती. तरीही खाण सुरूच होती. आता कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशीदेखील हेच अधिकारी करीत आहे. त्यामुळे एखाद्या अधिकाºयावर निलंबनाची कार्यवाही करून प्रकरण दडपले जाण्याची शक्यताही अधिक आहे. असे झाले तर घटनेला जबाबदार मुख्य अधिकारी अभय मिळेल.वेकोलि माजरी कामगारांच्या पाच कामगार संघटना असून या पाचही कामगार संघटनेचे नेता खाण सुरक्षा समितीमध्ये सदस्य आहेत. घटनेनंतर सुरक्षा समितीचे सदस्य माजरीच्या तेलवासा खाणीत येऊन पाहणी करून जात आहे. परंतु खाणीत बेंचेस का नाही, याबाबत कुणीही आक्षेप घेतलेला नाही, हे विशेष. पाचही कामगार संघटना चुप्पी साधून असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.