शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

तेलवासा कोळसा खाण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:39 IST

वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही.

ठळक मुद्देकामगार मृत्यूप्रकरण : बेंचेसअभावी खाण झाली होती विहिरीसारखी

राजेश रेवते।लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत २४ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर निरजू झा याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला आज सात दिवस होऊनही कोणत्याच अधिकाºयावर कारवाई झालेली नाही. यासंदर्भात वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे तेलवासा खाणीला बंद करण्यात आले आहे.तेलवासा कोळसा खाणीत कोळसा काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग करण्यात आली. वास्तविक, ब्लास्टिंगचे काम अंधारात न करता दुपारीच केले जाणे बंधनकारक आहे. मात्र ब्लास्टिंग अधिकारी, सुरक्षा अधिकारी व उपक्षेत्रीय प्रबंधक यांनी नियमबाह्यरित्या सायंकाळी ७ वाजता ब्लास्टिंग केली. अंधारात ब्लास्टिंग केल्यामुळे तिथे कोळसा पूर्णपणे खाली कोसळला की नाही, याची शाहनिशा करणे कठीण असते. घटनेच्या दिवसीही याबाबत शहानिशा झाली नव्हती, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. डोजर आॅपरेटर निरज झा जे डोजर मशीन चालवत होते, ते मशीन कालबाह्य झालेली होती, अशी माहिती आहे.विशेष म्हणजे, तेलवासा कोळसा खदान हे सध्या विहिरीसारखी खोल आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिथे बेंच बनवायला हवे होते. ज्यामुळे खाली काम करीत असताना वरून माती कोसळत नाही. मात्र या ठिकाणी बेंचेस बनविण्यात आलेले नाही.कोल इंडियाचे डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा), डायरेक्टर आॅफ टेक्नीकल आणि वेकोलि माजरीचे संपूर्ण अधिकारी यांना ही खाण कोळसा काढण्यासाठी सुरक्षित नाही, हे चांगले ठाऊक होते. तरीही या खाणीत कोळसा काढणे सुरुच ठेवण्यात आले होते. या तेलवासा खाणीला मागेच बंद केले असते, तर यात कामगार निरजू झा याचा जीव गेला नसता.डायरेक्टर आॅफ जनरल (सुरक्षा) अशोककुमार व डायरेक्टर आॅफ टेक्निकल लक्ष्मी नारायण यांनी आपल्या दौºयात अनेकदा या खाणीची पाहणी केली होती. तरीही खाण सुरूच होती. आता कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशीदेखील हेच अधिकारी करीत आहे. त्यामुळे एखाद्या अधिकाºयावर निलंबनाची कार्यवाही करून प्रकरण दडपले जाण्याची शक्यताही अधिक आहे. असे झाले तर घटनेला जबाबदार मुख्य अधिकारी अभय मिळेल.वेकोलि माजरी कामगारांच्या पाच कामगार संघटना असून या पाचही कामगार संघटनेचे नेता खाण सुरक्षा समितीमध्ये सदस्य आहेत. घटनेनंतर सुरक्षा समितीचे सदस्य माजरीच्या तेलवासा खाणीत येऊन पाहणी करून जात आहे. परंतु खाणीत बेंचेस का नाही, याबाबत कुणीही आक्षेप घेतलेला नाही, हे विशेष. पाचही कामगार संघटना चुप्पी साधून असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.