कोरोनामुळे तीन ते चार महिने कंपन्या बंद होत्या. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगमुळे काही प्रमाणात काम सुरू झाले. मात्र पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे काही प्रमाणात तेलाची टंचाई भासत होती. तसेच यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा आदी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तेलाच्या दरामध्ये दररोज वाढ होत आहे. मागील महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात तेलाच्या किमतीत चक्क ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. मागील महिन्यात शेंगदाणा तेल १४० रुपये प्रति किलो विकले जायचे; मात्र आता १६० रुपये, सूर्यफूल १२५ वरून १४०, तर पामतेलामध्येही १० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना आता जीवनावश्यक असणाऱ्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना बजेट बसविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
बॉक्स
सोयाबीनला फटका
यंदा अवकाळी तसेच परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. नवे पीक अद्यापही बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध झाले नाही. त्या तुलनेत मागणी वाढत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या तेलाचे भाव गगणाला भिडले आहेत.
कोट
कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य अडचणीत आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. घर चालवणे कठीण झाले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. अनेकांचे रोजगार हिरावले असताना, महागाईने तोंड वर काढले आहे. तेलाच्या किमतीत २० ते ३० रुपे प्रति किलो वाढ झाली असल्याने गरिबांना जगणे कठीण झाले आहे.
- मोनिका वाकोडे, गृहिणी, चंद्रपूर
कोट
पंधरवड्यापूर्वी तेलाचे भाव वाढले होते. मात्र मागील आठवडाभरात तेलाचे दर स्थिर आहेत. तेलाच्या दरामध्ये चढ-उतार होत असते.
इस्माईल ढाकवाला, बल्लारपूर
- राकेश ठाकरे, व्यापारी, मूल