शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

राज्यातल्या २० जिल्ह्यातील घाटावरील रेती उपसा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:45 IST

नुकतेच रेती घाटाचे लिलाव करण्यात आले. त्यानंतर कंत्राटदारांमार्फत रेतीचा उपसा करून वाहतूक करणे सुरू झाले. याला एक महिना होत नाही तोच, रेतीचा उपसा बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ठळक मुद्देन्यायालयाचा आदेश रेतीघाट कंत्राटदारांमध्ये चिंता

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नुकतेच रेती घाटाचे लिलाव करण्यात आले. त्यानंतर कंत्राटदारांमार्फत रेतीचा उपसा करून वाहतूक करणे सुरू झाले. याला एक महिना होत नाही तोच, रेतीचा उपसा बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानुसार राज्यातील २० जिल्ह्यातील रेती घाटावरील उपसा व वाहतूक बंद होणार आहे. तसे निर्देश महसूल विभागानेही दिले आहे. यामुळे राज्यभरातील रेती घाट कंत्राटदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.रेती उचलण्याकरिता ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत रेती घाट घेणाऱ्यांना देण्यात आली. एप्रिल महिन्यात रेतीचा उपसा व वाहतूक करणे सुरू झाले व २ मे रोजी महसूल विभागाने आदेश देवून रेती घाटातील उपसा व वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले. रेती घाट घेणाऱ्यांनी लाखो रुपये शासनाकडे अदा केले आहे. जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याने पुढील काही महिने रेती परवाना असतानाही काढणे अडचणीचे असते. अशातच मे महिन्यात रेती उपसा व वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने रेती घाट घेणाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.जनहित याचिकेवर निर्णयरेती घाट लिलावसंदर्भात एका व्यक्तीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २९ एप्रिल २०१९ रोजी राज्यातील २० जिल्ह्यातील रेती घाटावरील रेतीचा उपसा व वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला.२४ टक्के कररेती घाट घेणाऱ्या व्यक्तीस घाटाच्या मूळ किमतीवर १८ टक्के जीएसटी, एक टक्का टीसीएस तर डिस्ट्रीक मॅजिस्ट्रेट डेव्हलप फंडला पाच टक्के असे एकूण २४ टक्के कर यापूर्वीच अदा करावा लागला आहे.चोऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यताउन्हाळा असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जात आहे. बांधकामाला रेतीची आवश्यकता असते. रेती घाट बंद झाल्याने संपूर्ण राज्यभरात रेती तस्करी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वाहने ठप्परेती घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर रेती घाटधारकांनी वाहने लावली. ही वाहने आता धूळ खात आहेत. त्यामुळे वाहनावरील कर्जाचे हप्ते कसे भरावे, हा प्रश्न सध्यातरी वाहनधारकांना भेडसावत आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय