शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

नोकर भरतीसाठी बनावट कागदपत्रे वैध ठरविणारे अधिकारी मोकाट

By साईनाथ कुचनकार | Updated: October 11, 2023 14:35 IST

सीटीपीएस नोकर भरती प्रकरण 

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या ३२ प्रपत्रधारकांवर मूळ प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ही प्रपत्र वैध ठरविणाऱ्या पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सीटीपीएसमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची तत्काळ चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.

या प्रकरणात बनावट कागदपत्रे वैध ठरविणाऱ्या चंद्रपूर पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सीटीपीएसमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न दाखल केला होता. आमदार अडबाले यांनी दाखल केलेल्या प्रश्नावर सीटीपीएसमधील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे उर्जामंत्र्यांनी निवेदन सादर केले. पण पुनर्वसन कार्यालयातील कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे आमदार अडबाले यांनी पुनर्वसन व सीटीपीएस अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली. मूळ प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष असल्याने बनावट कागदपत्रे वैध ठरविणाऱ्या चंद्रपूर पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सीटीपीएसमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी. तसेच या प्रकरणातील रॅकेटवरसुद्धा कारवाई करावी, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाळे, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे, भास्कर सपाट, पप्पू देशमुख, रवी झाडे, आत्माराम देवतळे व सीटीपीएस व पुनर्वसन विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. यात प्रकल्पग्रस्त म्हणून काहींनी खोटी कागदपत्रे बनवून नोकऱ्या मिळवल्या. याबाबत सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे व प्रकल्पग्रस्तांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुनर्वसन विभागाने चौकशी केली असता, १२८ पैकी ७२ प्रपत्रधारकांना अपात्र ठरविण्यात आले. त्यातील ३२ बनावट प्रपत्रधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्यक्षात ज्या विभागाने प्रपत्र वैध ठरवले, त्याच विभागाने ३२ प्रपत्रधारकांना अपात्र ठरविल्याने प्रशासकीय यंत्रणेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीjobनोकरीGovernmentसरकारchandrapur-acचंद्रपूर