शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा शिबिराला अधिकारी, कर्मचारीच गैरहजर

By admin | Updated: July 29, 2015 00:51 IST

२०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे ...

गांगलवाडी : २०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे आयोजित पीक विमा संदर्भातील शिबिराला अधिकारी व कर्मचारीच गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.दुष्काळ सदृश्य परिस्थितीपासून शेतकरी सुरक्षित रहावा या उद्देशाने शासनाच्या वतीने दरवर्षी पीक विमा काढला जातो. २०१४-१५ या वर्षात ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्या गेला होता. मात्र पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळण्यात आले. यामुळे पीक विम्याच्या निकषाबाबत शेतकरी संभ्रमात आहे. हा संभ्रम दूर होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा या अनुषंगाने सोमवारी आवळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कृषी विभागाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात परिसरातील ११ गावातील शेकडो शेतकरी उपस्थित झाले होते. मात्र सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी एफ.डी. शेंडे, वसुली अधिकारी पी.एस. कोलते व आवळगावचे ग्राम विकास अधिकारी पी. टी. पारधी वगळता अन्य एकही अधिकारी व कमरचारी उपस्थित नव्हते.शिबिरात उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न केले. परंतु या संदर्भात कृषी अधिकारीच माहिती देऊ शकतात, असे कारण सांगितल्याने सर्व शेतकरी परत गेले. यानंतर दुपारी १.३० वाजता ब्रह्मपुरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. डी. कारडवार व कृषी विस्तार अधिकारी बी.एम. आत्राम शिबिरात उपस्थित झाले. परंतु, यावेळी मोजकेच शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यास सांगितले. मात्र शिबिरात एकही तलाठी उपस्थित नसल्याने सातबारा व नमूना आठ अभावी शेतकरी पीक विमा काढू शकले नाही.शिबिरासंदर्भात कृषी विभागाने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना शिबिरात उपस्थित ठेवा, असे पत्र दिल्याचे कृषी अधिकारी कारडवार यांनी सांगितले. मात्र शिबिरामध्ये कुणीच अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित न राहिल्याने प्रशासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम लोणारे, सदस्य खुशाल ठिकरे, आक्सापूर उपसरपंच योगेन्द्र गणवीर, भगवान नवघडे, आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष केवळराम ठिकरे यांनी केला आहे. (वार्ताहर)