शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा शिबिराला अधिकारी, कर्मचारीच गैरहजर

By admin | Updated: July 29, 2015 00:51 IST

२०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे ...

गांगलवाडी : २०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे आयोजित पीक विमा संदर्भातील शिबिराला अधिकारी व कर्मचारीच गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.दुष्काळ सदृश्य परिस्थितीपासून शेतकरी सुरक्षित रहावा या उद्देशाने शासनाच्या वतीने दरवर्षी पीक विमा काढला जातो. २०१४-१५ या वर्षात ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्या गेला होता. मात्र पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळण्यात आले. यामुळे पीक विम्याच्या निकषाबाबत शेतकरी संभ्रमात आहे. हा संभ्रम दूर होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा या अनुषंगाने सोमवारी आवळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कृषी विभागाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात परिसरातील ११ गावातील शेकडो शेतकरी उपस्थित झाले होते. मात्र सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी एफ.डी. शेंडे, वसुली अधिकारी पी.एस. कोलते व आवळगावचे ग्राम विकास अधिकारी पी. टी. पारधी वगळता अन्य एकही अधिकारी व कमरचारी उपस्थित नव्हते.शिबिरात उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न केले. परंतु या संदर्भात कृषी अधिकारीच माहिती देऊ शकतात, असे कारण सांगितल्याने सर्व शेतकरी परत गेले. यानंतर दुपारी १.३० वाजता ब्रह्मपुरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. डी. कारडवार व कृषी विस्तार अधिकारी बी.एम. आत्राम शिबिरात उपस्थित झाले. परंतु, यावेळी मोजकेच शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यास सांगितले. मात्र शिबिरात एकही तलाठी उपस्थित नसल्याने सातबारा व नमूना आठ अभावी शेतकरी पीक विमा काढू शकले नाही.शिबिरासंदर्भात कृषी विभागाने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना शिबिरात उपस्थित ठेवा, असे पत्र दिल्याचे कृषी अधिकारी कारडवार यांनी सांगितले. मात्र शिबिरामध्ये कुणीच अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित न राहिल्याने प्रशासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम लोणारे, सदस्य खुशाल ठिकरे, आक्सापूर उपसरपंच योगेन्द्र गणवीर, भगवान नवघडे, आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष केवळराम ठिकरे यांनी केला आहे. (वार्ताहर)