शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

भद्रावती शहरातील फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा

By admin | Updated: January 13, 2017 00:35 IST

भद्रावती नगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या सुखसोयीसाठी मुख्य मार्गाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण केले.

नागरिक त्रस्त : नगर पालिकेने लक्ष देण्याची मागणीआयुधनिर्माणी (भद्रावती) : भद्रावती नगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या सुखसोयीसाठी मुख्य मार्गाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण केले. परंतु फुटपाथवर अद्यापही दुकानदारांचाच कब्जा असल्याने नागरिकांचा फुटपाथवरुन चालणाऱ्यांचा अधिकार हिरावला जात आहे. दुसरीकडे या अवैध कब्जामुळे शहरात पार्किंगची व्यवस्था बाधीत झाली असून नागरिकांना रस्त्यावरुन चालण्यासाठी हक्काचा फुटपाथ मिळेल का, अशी विचारणा नागरिक करत आहे.भद्रावती शहरात मुख्य मार्गाचे रुंदीकरण झाले असून रस्ता अत्याधुनिक बनवण्यात आला आहे. रस्त्यावरुन वाहने व फुटपाथवरुन पादचाऱ्यांना जाता येईल, अशी अपेक्षा होती. परंतु शहरातील मुख्य मार्गाचा फेरफटका मारला असता फुटपाथ केवळ नामधारीच उरला असून त्याचा फायदा दुकानादारच मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसत आहे. बुधवार हा भद्रावती शहरातील आठवडी बाजाराच दिवस असतो. या दिवशी परिसरातील ग्रामस्थ बाजार हाटाकरीता आपापल्या वाहनांनी येत असतात. या दिवशी फुटपाथवर निदान वाहने तरी उभी ठेवता येईल अशी परिस्थिती नसल्याने भर रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतुक व्यवस्था कोलमडून नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागते. ऐन वर्दळीच्या गांधी चौकातील महाराष्ट्र बँकेच्या बाजुचा एक दुकानदार तर चक्क दोराचे कंपाउंड करुन चौकात पार्किंगची समस्या निर्माण करतो. पालिकेने पुढाकार घेऊन नागरिकांना हक्काचा फुटपाथ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)