शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक चिंतेत : पिरलीतील मध जाते राज्यभर

By admin | Updated: July 14, 2014 01:52 IST

नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले

मधपेट्याच्या नुकसानीची झळ कायमचभद्रावती : नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले भद्रावती तालुक्यातील पिरली हे गाव मधमाशांच्या वसाहती मिळण्याचे विदर्भातील प्रमुख ठिकाण बनले आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मधमाशा पालन व्यवसायाचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील मध विदर्भातच नव्हे तर राज्यातही पोहचले आहे. परंतु मागील वर्षी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात येथील ११ मधपाळांच्या ८३ मधपेट्या वाहून गेल्या. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याची झळ मात्र या व्यवसायाला पोहचली आहे. त्यातून आजही येथील मधपाळ सावरले नसल्याचे चित्र आहे.१५ वर्षांपूर्वी येथील संजय कोलते व गोवर्धन शेंडे या युवकांनी कुठलेही प्रशिक्षण नसताना फक्त इच्छाशक्तीच्या आधारे मधमाशी पालन व्यवसायाला पिरली येथे सुरूवात केली. निसर्गातील मधमाशा शोधून व झाडाच्या पोकळीतून काढून त्या मधमाशा पेटीत टाकण्याचा सपाटा त्या युवकांनी सुरू केला. प्रशिक्षणाअभावी मधमाशा सुरूवातीला पेटीत राहत नव्हत्या. प्रशिक्षणाच्या शोधात त्यांची मधुकर भलमे व प्रा. तात्यासाहेब धानोरकर यांची भेट झाली. त्यानंतर पिरली येथील सात युवकांनी शेगावला दररोज सायकलने ये-जा करून १५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आणि पिरली येथे शास्त्रशुद्ध पध्दतीने मधमाशी पालन व्यवसायास सुरूवात झाली. खादी ग्रामोद्योग चंद्रपूर व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमाने याठिकाणी निवासी मधपाळ प्रशिक्षण घेण्यात आले. एकट्या पिरली गावाचे ११ मधपाळ यात सहभागी झाले.आज याठिकाणी मधमाशा पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यांना शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून पाहिले जात आहे. या व्यवसायाला जास्त भागभांडवलाची आवश्यकता नाही. तसेच या व्यवसायामुळे परागकिरणाची क्रिया जलद होऊन शेतीच्या उत्पादनात जवळपास ४० टक्क्याने वाढ होते. याठिकाणी या व्यवसायासाठी लागणाऱ्या रिकाम्या पेट्यांचीसुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात होते.यावर्षी अत्यंल्प पावसामुळे मधमाशा पालन व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. मागील वर्षी पुरामुळे तर यावर्षी पाऊस नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील वर्षी पुरामुळे पेट्या वाहून गेल्या. वसाहती पकडून मधपेट्या भरण्यास बहुतेकांकडे रिकाम्या मधपेट्या उरलेल्या नाहीत. शासनाकडून नुकसान भरपाईही नाही. या उलट या व्यवसायाबाबत शासनाकडे नुकसानभरपाईची तरतूदच नसल्याचे सांगण्यात येते. शेतीचा उत्तम जोडधंदा म्हणून नुकसान भरपाईची शासनाने तरतूद करावी, अशी मागणी येथील मधपाळ संजय कोलते, होमेश्वर वाढई, उत्तम काकडे, गोवर्धन शेंडे, सुभाष आसूटकर, नेना पिंपळशेंडे, रवींद्र तरारे, प्रज्वल काकडे, संजय मत्ते, विनोद कोलते तसेच सरपंच विजय तरारे, ग्रामस्थ महादेव कोल्हे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)