शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

व्यावसायिक चिंतेत : पिरलीतील मध जाते राज्यभर

By admin | Updated: July 14, 2014 01:52 IST

नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले

मधपेट्याच्या नुकसानीची झळ कायमचभद्रावती : नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले भद्रावती तालुक्यातील पिरली हे गाव मधमाशांच्या वसाहती मिळण्याचे विदर्भातील प्रमुख ठिकाण बनले आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मधमाशा पालन व्यवसायाचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील मध विदर्भातच नव्हे तर राज्यातही पोहचले आहे. परंतु मागील वर्षी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात येथील ११ मधपाळांच्या ८३ मधपेट्या वाहून गेल्या. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याची झळ मात्र या व्यवसायाला पोहचली आहे. त्यातून आजही येथील मधपाळ सावरले नसल्याचे चित्र आहे.१५ वर्षांपूर्वी येथील संजय कोलते व गोवर्धन शेंडे या युवकांनी कुठलेही प्रशिक्षण नसताना फक्त इच्छाशक्तीच्या आधारे मधमाशी पालन व्यवसायाला पिरली येथे सुरूवात केली. निसर्गातील मधमाशा शोधून व झाडाच्या पोकळीतून काढून त्या मधमाशा पेटीत टाकण्याचा सपाटा त्या युवकांनी सुरू केला. प्रशिक्षणाअभावी मधमाशा सुरूवातीला पेटीत राहत नव्हत्या. प्रशिक्षणाच्या शोधात त्यांची मधुकर भलमे व प्रा. तात्यासाहेब धानोरकर यांची भेट झाली. त्यानंतर पिरली येथील सात युवकांनी शेगावला दररोज सायकलने ये-जा करून १५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आणि पिरली येथे शास्त्रशुद्ध पध्दतीने मधमाशी पालन व्यवसायास सुरूवात झाली. खादी ग्रामोद्योग चंद्रपूर व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमाने याठिकाणी निवासी मधपाळ प्रशिक्षण घेण्यात आले. एकट्या पिरली गावाचे ११ मधपाळ यात सहभागी झाले.आज याठिकाणी मधमाशा पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यांना शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून पाहिले जात आहे. या व्यवसायाला जास्त भागभांडवलाची आवश्यकता नाही. तसेच या व्यवसायामुळे परागकिरणाची क्रिया जलद होऊन शेतीच्या उत्पादनात जवळपास ४० टक्क्याने वाढ होते. याठिकाणी या व्यवसायासाठी लागणाऱ्या रिकाम्या पेट्यांचीसुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात होते.यावर्षी अत्यंल्प पावसामुळे मधमाशा पालन व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. मागील वर्षी पुरामुळे तर यावर्षी पाऊस नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील वर्षी पुरामुळे पेट्या वाहून गेल्या. वसाहती पकडून मधपेट्या भरण्यास बहुतेकांकडे रिकाम्या मधपेट्या उरलेल्या नाहीत. शासनाकडून नुकसान भरपाईही नाही. या उलट या व्यवसायाबाबत शासनाकडे नुकसानभरपाईची तरतूदच नसल्याचे सांगण्यात येते. शेतीचा उत्तम जोडधंदा म्हणून नुकसान भरपाईची शासनाने तरतूद करावी, अशी मागणी येथील मधपाळ संजय कोलते, होमेश्वर वाढई, उत्तम काकडे, गोवर्धन शेंडे, सुभाष आसूटकर, नेना पिंपळशेंडे, रवींद्र तरारे, प्रज्वल काकडे, संजय मत्ते, विनोद कोलते तसेच सरपंच विजय तरारे, ग्रामस्थ महादेव कोल्हे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)