शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

आता शिक्षकांची कागदोपत्री कामापासून होणार सुटका

By admin | Updated: June 26, 2015 01:20 IST

शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम राज्यभरात चालू सत्रापासून राबविण्यात येणार आहे.

चंद्रपूर : शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम राज्यभरात चालू सत्रापासून राबविण्यात येणार आहे. यासह शासकीय शाळा गुणवत्तेत माघारण्याची कारणेही शोधली जाऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिक्षकांच्या मागे असलेली अशैक्षणिक कामे व अध्यापनाऐवजी वाढत असलेल्या कागदी कामाचा व्याप, यासह केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यासारखे प्रशासकीय घटक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याऐवजी कागदोपत्री माहितीला देत असलेले प्राधान्य ही गुणवत्ता माघारण्यासाठी एक कारण नक्कीच आहे. त्यामुळे या सत्रापासून शिक्षक व प्रशासकीय घटकांची कागदोपत्री माहितीच्या कामातून सुटका करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली आहे. यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेद्वारा आयोजित राज्यस्तरीय गुणवत्ता विकास कार्यशाळेत महावीर माने यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेला चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर.जी. भानारकर, विनायक घटे, शंकर पाटील, मारोती सावंत, विजय भोगेकर, अशोक पाटील, दीपक वऱ्हेकर, राजेश दरेकर उपस्थित होते. यापुढे शाळा सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात संपूर्ण शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती वर्षभरात फक्त एकदाच मागण्यात येईल. शिक्षकांनी या विचाराचे सकारात्मक स्वागत केले आहे. शिक्षक या अध्यापनाऐवजी असलेल्या कागदोपत्री कामाने त्रस्त झाले होते. त्यांचा अध्यापनाचा बराचसा वेळ या कामात वाया जात होता. राज्याचे प्रमुख अधिकारी यांनी याप्रमाणे सकारात्मक विचार करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याचे पाहून शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबाबत यावेळी जिल्ह्यातील शिक्षक हरीश ससनकर, अल्का ठाकरे यांचे शिक्षक संचालक महावीर माने यांच्याकडून कौतुकही करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मागील सत्रापासून सुरू असलेले शैक्षणिक नवोपक्रम व गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांचा पुढाकार, यावर हरीश ससनकर यांनी विचार व्यक्त केले. अल्का ठाकरे यांनी शिक्षकांच्या पुढाकारातून व एकजुटीतून गुणवत्तेकडे झेप घेत असलेल्या जिल्ह्यातील शाळांची या कार्यशाळेत उपस्थितांना माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)