शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

आता रेशीम शेतीला रोहयोची साथ

By admin | Updated: November 9, 2014 22:31 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.

पेंढरी : चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ढिवर (भोई) समाज बांधवांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजुरी मिळणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी येथे रेशीम कोसा उद्योग केंद्र असून या केंद्रातंर्गत पाथरी, गुंजेवाही, गांगलवाडी, मेंडकी पेंढरी (कोकेवाडा), मोठेगाव, सिरपूर, काजळसर, इत्यादी ठिकाणचे भोई बांधव रेशीमची लागवड करतात. परंतु त्यांच्या कोशाला साजेसा भाव मिळत नसल्याने व तसेच त्यांना भरपूर प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याने व घरची सर्व मंडळी या शेतीत व्यस्त असल्याने ही रेशीम शेती याअगोदर परवडणारी नव्हती. परंतु आता राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार रेशीम उत्पादन हा शेतीशी निगडीत व्यवसाय असल्याने याला रोजगार हमी योजनेचे बळ मिळणार आहे. या अगोदर रेशीम उत्पादनाची कामे रोहयोच्या माध्यमातून करण्यास शासनाची परवानगी नव्हती. या उद्योगाद्वारे रेशीम किडे सोडणे, त्याचे संगोपन करणे, झाडाची छाटणी करणे, रेशीम किडे गोळा करणे आदी कामे केली जातात.या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांसाठी एक लाख ९६ हजाराचे अंदाजपत्रक तयार करावे लागणार असून त्यामध्ये नऊ हजार रुपये लाभार्थ्यांचा भत्ता राहणार आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया अजूनपर्यंत सुरु झाली नसल्याचे कळते. परंतु या बारमाही रोजगारामुळे भोई समाज बांधवात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)