शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

...आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर, राम्याचा ताप किती, हेही तपासावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तसेच शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेमध्ये  हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यामुळे प्रत्येक शाळेतील गुरुजी डाॅक्टर होणार असून विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्यासोबतच शाळेत येताना घ्यावयाची काळजी, आदी सूचना शासनाने केल्या आहेत. 

हेल्थ क्लिनिकमध्ये काय काय राहणार- शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करून ऑक्सिमिटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य शाळांनी उपलब्ध करून द्यावे.- विद्यार्थ्यांचे नियमित टेम्परेचर, सर्व शाळा आरोग्य केंद्राशी सलग्न कराव्यात.   इच्छुक डाॅक्टर, पालकांची मदत घ्यावी.- आरोग्य केंद्रातील डाॅक्टर व परिचारिकांची मदत घ्यावी.- येता-जाताना मुलांचा मास्क पडला तर मुलांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी शाळांनी मास्कचा साठा ठेवावा.

शिक्षकांची जबाबदारी वाढणारnकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे.nशाळेत आलेल्या प्रत्येक मुलांचे तापमान, ऑक्सिजन मात्रा तपासून नोंद करावी लागणार आहे.nएखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, ताप असल्याचे लक्षात आल्यास तातडीने त्याच्या पालकांना कळवून वैद्यकीय उपचारासाठी घरी पाठवावे लागणार आहे.nकोरोना होऊन गेलेल्या मुलांशी शिक्षकांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागायचे आहे.

शिक्षक काय म्हणतात....

शाळा सुरू झाल्या आहे. याचे प्रत्येकांना समाधान आहे. शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू आहे. विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे. मात्र, सुविधा पुरविण्यासाठी शासनानेही शाळांना अनुदान देणे महत्त्वाचे आहे.-प्राचार्य नरेंद्र बोबडे, अध्यक्ष, मुख्याध्यापक असोसिएशन, चंद्रपूर 

विद्यार्थ्यांच्या आरोग्य जपण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये तपासणी केली जात आहे. शासकीय नियमावलीचे पालन करून वर्ग भरविले जात आहे. पालकांचेही सहकार्य लाभत आहे.-राजू साखरकर, मुख्याध्यापक, चंद्रपूर

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या