शहरं
Join us  
Trending Stories
1
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
2
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
3
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
4
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
5
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
6
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
7
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
8
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
9
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
10
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
11
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
12
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
13
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
14
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
15
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
16
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
17
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
18
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
19
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
20
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
Daily Top 2Weekly Top 5

...आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर, राम्याचा ताप किती, हेही तपासावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तसेच शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेमध्ये  हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यामुळे प्रत्येक शाळेतील गुरुजी डाॅक्टर होणार असून विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्यासोबतच शाळेत येताना घ्यावयाची काळजी, आदी सूचना शासनाने केल्या आहेत. 

हेल्थ क्लिनिकमध्ये काय काय राहणार- शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करून ऑक्सिमिटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य शाळांनी उपलब्ध करून द्यावे.- विद्यार्थ्यांचे नियमित टेम्परेचर, सर्व शाळा आरोग्य केंद्राशी सलग्न कराव्यात.   इच्छुक डाॅक्टर, पालकांची मदत घ्यावी.- आरोग्य केंद्रातील डाॅक्टर व परिचारिकांची मदत घ्यावी.- येता-जाताना मुलांचा मास्क पडला तर मुलांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी शाळांनी मास्कचा साठा ठेवावा.

शिक्षकांची जबाबदारी वाढणारnकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे.nशाळेत आलेल्या प्रत्येक मुलांचे तापमान, ऑक्सिजन मात्रा तपासून नोंद करावी लागणार आहे.nएखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, ताप असल्याचे लक्षात आल्यास तातडीने त्याच्या पालकांना कळवून वैद्यकीय उपचारासाठी घरी पाठवावे लागणार आहे.nकोरोना होऊन गेलेल्या मुलांशी शिक्षकांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागायचे आहे.

शिक्षक काय म्हणतात....

शाळा सुरू झाल्या आहे. याचे प्रत्येकांना समाधान आहे. शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू आहे. विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे. मात्र, सुविधा पुरविण्यासाठी शासनानेही शाळांना अनुदान देणे महत्त्वाचे आहे.-प्राचार्य नरेंद्र बोबडे, अध्यक्ष, मुख्याध्यापक असोसिएशन, चंद्रपूर 

विद्यार्थ्यांच्या आरोग्य जपण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये तपासणी केली जात आहे. शासकीय नियमावलीचे पालन करून वर्ग भरविले जात आहे. पालकांचेही सहकार्य लाभत आहे.-राजू साखरकर, मुख्याध्यापक, चंद्रपूर

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या