शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाच्या आराखड्यासाठी आता ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे. नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देलगबग सुरू : बाल व महिला सभा घेण्याचे दिले आहेत निर्देश

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षातील 'आमचा गाव आमचा विकास' या आराखड्यासाठी नागभीड पंचायत समितीच्या वतीने कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे.नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या आराखडयाच्या अनुषंगानेच १३ व १४ नोव्हेंबर रोजी गणस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. १३ नोव्हेंबरला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसंसाधन गट यांची तर १४ नोव्हेंबर रोजी महिला स्वयंसहाय्यता गटाचे ग्रामसंघ, ग्रामसेविका व ग्रामस्तरीय कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या गणस्तरीय कार्यशाळा मोहाळी, मौशी, पारडी ठवरे, बाळापूर (बुज), गोविंदपूर, तळोधी (बाळा), गिरगाव व सावरगाव येथे पार पडणार आहेत. या ठिकाणी पार पडणाºया कार्यशाळांना १०० प्रशिक्षणार्थी उपस्थित राहतील, असे अपेक्षित आहे.या कार्यशाळा पार पडल्यानंतर १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभा घेण्याचे नियोजन पंचायत समितीने केले आहे. या ग्रामसभेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रभारी आधिकारी यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. ग्रामसभेपूर्वी बालसभा, मागास व उपेक्षित घटकांची सभा, वार्ड सभा, महिला सभा आदी प्रकारच्या सभा घ्याव्यात, अशा सूचना पंचायत समितीच्या वतीने सर्व सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.हे अभिप्रेतकृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, सिंचाई, पंचायत विभाग, बांधकाम विभाग या व अन्य प्रत्येक विभागाची कामे या ग्रामसभेत नागरिकांकडून सूचविण्याचे अभिप्रेत आहे. या सूचविण्यात आलेल्या कामानुसारच पुढील आराखडा निश्चित होणार आहे.या ग्रामसभेत गाव विकासाच्या दृष्टीने जी कामे सूचविण्यात येतील. त्यानुसार पुढच्या पाच वर्षात कामे होणार आहेत. म्हणूनच या ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आमचा गाव आमचा विकास या योजनेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी ग्रामसभेस उपस्थित राहणे गरजेचे आहे.- प्रणाली खोचरेगटविकास आधिकारी पं.स.नागभीड

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास