शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

ग्रामविकासाच्या आराखड्यासाठी आता ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे. नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देलगबग सुरू : बाल व महिला सभा घेण्याचे दिले आहेत निर्देश

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षातील 'आमचा गाव आमचा विकास' या आराखड्यासाठी नागभीड पंचायत समितीच्या वतीने कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे.नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या आराखडयाच्या अनुषंगानेच १३ व १४ नोव्हेंबर रोजी गणस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. १३ नोव्हेंबरला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसंसाधन गट यांची तर १४ नोव्हेंबर रोजी महिला स्वयंसहाय्यता गटाचे ग्रामसंघ, ग्रामसेविका व ग्रामस्तरीय कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या गणस्तरीय कार्यशाळा मोहाळी, मौशी, पारडी ठवरे, बाळापूर (बुज), गोविंदपूर, तळोधी (बाळा), गिरगाव व सावरगाव येथे पार पडणार आहेत. या ठिकाणी पार पडणाºया कार्यशाळांना १०० प्रशिक्षणार्थी उपस्थित राहतील, असे अपेक्षित आहे.या कार्यशाळा पार पडल्यानंतर १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभा घेण्याचे नियोजन पंचायत समितीने केले आहे. या ग्रामसभेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रभारी आधिकारी यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. ग्रामसभेपूर्वी बालसभा, मागास व उपेक्षित घटकांची सभा, वार्ड सभा, महिला सभा आदी प्रकारच्या सभा घ्याव्यात, अशा सूचना पंचायत समितीच्या वतीने सर्व सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.हे अभिप्रेतकृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, सिंचाई, पंचायत विभाग, बांधकाम विभाग या व अन्य प्रत्येक विभागाची कामे या ग्रामसभेत नागरिकांकडून सूचविण्याचे अभिप्रेत आहे. या सूचविण्यात आलेल्या कामानुसारच पुढील आराखडा निश्चित होणार आहे.या ग्रामसभेत गाव विकासाच्या दृष्टीने जी कामे सूचविण्यात येतील. त्यानुसार पुढच्या पाच वर्षात कामे होणार आहेत. म्हणूनच या ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आमचा गाव आमचा विकास या योजनेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी ग्रामसभेस उपस्थित राहणे गरजेचे आहे.- प्रणाली खोचरेगटविकास आधिकारी पं.स.नागभीड

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास