शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

धानापाठोपाठ आता कापूसही संकटात

By admin | Updated: September 13, 2014 23:46 IST

मागील वर्षी सोयाबीनचे पीक आकस्मिक झालेल्या पावसात सापडल्याने चालु हंगामात सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळाले नाही. शेतकरी नगदी समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पादनाकडे वळले आहे.

वरोरा : मागील वर्षी सोयाबीनचे पीक आकस्मिक झालेल्या पावसात सापडल्याने चालु हंगामात सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळाले नाही. शेतकरी नगदी समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पादनाकडे वळले आहे. कपाशीचे पीक फुलावर असताना अचानक मर रोगाने कपाशी पिकावर आक्रमण केले असून कपाशीची झाडे उलमडून पडत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या बियाणाची उगवण क्षमता दर्जेदार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खर्चाचे पीक असतानाही कपाशीची लागवड केली. हंगामाच्या सुरुवातीला पाऊस आल्याने कपाशीची लागवड करण्यात आली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार व तिबार कपाशीची लागवड करावी लागल्याने प्रारंभी मोठ्या प्रमाणात खर्च झाला. त्यानंतर कपाशीला आवश्यक असताना पाऊस पडत गेल्याने कपाशीची मशागत चांगल्या प्रकारे करता आली. काही दिवसांपूर्वी कपाशीचे पीक सर्वत्र चांगले असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी सुखाविला होता. सध्या कपाशीला पात्या फुले येत असून काही कपाशींना बोंड लागणे सुरू झाले आहे. असे असतानाच मागील काही दिवसात सातत्याने पाऊस पडला. सध्याची कपाशीची अवस्था पात्या फुले येण्याची असल्याने मूळ घट्ट असणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलाव्याने कपाशीच्या झाडाचे मूळ कमजोर झाले. मुळाचा व जमिनीचा संपर्क तुटत आहे. झाडाच्या खोडाला अन्न व पाणी मिळत नाही. त्यामुळे कपाशीचे झाडे उन्मळून पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)