शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शुध्द पाणी अशुध्द करणाऱ्यांवर आता होणार कारवाई !

By admin | Updated: June 12, 2016 00:43 IST

द्ध पाणी पिणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याच्या असलेल्या स्त्रोतांवर गावातील नागरिक भांडी ...

पाणी गुणवत्ता कार्यशाळा : जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देशचंद्रपूर : शुद्ध पाणी पिणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याच्या असलेल्या स्त्रोतांवर गावातील नागरिक भांडी धुणे किंवा जनावरांना पाणी पाजणे किंवा कपडे धुणे अशी कामे करत असतील तर ते पाणी अशुद्ध होत. ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. त्यामुळे अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी दिले. जिल्हा परिषदेमधील कन्नमवार सभागृहात आयोजित पाणी गुणवत्ता कार्यशाळेत त्या बोलत होत्या.कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह, महिला व बाल कल्याण सभापती सरिता कुडे, अर्थ व आरोग्य समिती ईश्वर मेश्राम, आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेश राठोड, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग मिलिंद चंद्रागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत वृक्ष व पुस्तक भेट देऊन करण्यात आले.संध्या गुरुनुले पुढे म्हणाल्या, पाणी शुद्ध ठेवणे ही एकट्या आरोग्य विभागाची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक कर्मचारी तसेच प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. शाळांमधील असलेल्या लहान मुलांना शुद्ध पाणी कसे मिळेल, याकडे जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षक, मुख्याध्यापक यांनी प्रयत्न करावे. लहान मुलांची प्रकृती सुदृढ नसेल तर घरच्यांना आर्थिक हानी पोहोचेल आणि ही बालके देशाचा विकास करू शकणार नाहीत. कारण त्यांची प्रकृतीच चांगली नसेल. त्यामुळे लहान मुलांना निर्जंतुक पाणी मिळाले पाहिजे यावर भर द्यावा, असे त्या म्हणाल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह म्हणाले, तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता आज आपण शासन निर्णय म्हणून वापरतो. त्यांनी त्याच काळात भविष्यवाणी करून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले होते. ते आज आपल्या कामी पडत आहेत. गावातील पाणी शुद्ध ठेवणे ही एकट्याची कुणाची जबाबदारी नसून ती सर्व विभागांनी एकत्रित काम करावे. म्हणजे आपले गाव स्वच्छ राहील. पाणी गुणवत्ता कार्यशाळा आयोजित करण्यामागील हेतू नागरिकांना पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीचे महत्त्व, शुद्ध पाण्यासाठी जनजागृती होणे हा आहे व याची प्रचार प्रसिद्धी आपण गावागावात जावून करावी असे ते म्हणाले.कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पाणी गुणवत्ता स्वच्छता व आरोग्य यांचा संबंध, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम यांनी स्वच्छता सर्वेक्षणात आढळून आलेल्या त्रुटींमुळे ग्रामपंचायतींना वितरित केलेले लाल व पिवळे कार्ड, साथीच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. ब्लिचींग पावडरचे महत्त्व, साठवण, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ टेंभुर्णीकर यांनी ओटी टेस्ट करणे, फिल्ड टेस्ट कीट कशी वापरावी, याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पाणी गुणवत्ता सल्लागार अंजली डाहुले यांनी जिल्हा पाणी सुरक्षा कृती आराखडा यावर सादरीकरण करून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन समाज शास्त्रज्ञ प्रकाश उमके यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बोदेले यांनी केले. कार्यशाळेला गट विकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)