शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कुख्यात हाजीला चंद्रपूर कारागृहाने नाकारले

By admin | Updated: May 11, 2015 01:05 IST

विविध गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड हाजी सरवर याला शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली;

रूपेश कोकावार चंद्रपूर (बाबूपेठ)विविध गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड हाजी सरवर याला शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली; मात्र चंद्रपूर येथील कारागृह प्रशासनाने त्याला ठेवण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी रविवारी १० वाजता चोख बंदोबस्तात हाजीला नागपूर येथील कारागृहात हलविलेकारागृह प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पोलिसांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हाजी सरवरच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेता, त्याला नागपूरला नेत असताना काही विपरीत घडले असते तर, त्याची जबाबदारी कुणी स्वीकारली असती, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मंगळवारी ५ मे रोजी हाजीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला २२ मेपर्यंत चंद्रपूरच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजावले. हा आदेश मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर टिक्कस व त्यांच्या पथकातील सदस्य हाजी सरवरला चंद्रपूरच्या कारागृहात घेऊन गेले. मात्र नागपूरच्या कारागृहातून काही खतरनाक गुंड पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून चंद्रपूर कारागृहाचे अधीक्षक ए.के. जाधव यांनी हाजीला कारागृहात ठेवण्यास थेट नकार दिला. यावेळी पोलिसांनी जाधव यांना एका रात्रीपुरते तरी हाजीला येथे ठेवा, अशी विनवणी केली. मात्र जाधव यांनी पोलिसांचे काहीएक ऐकले नाही. अखेर नाईलाज झाल्याने पोलिसांना त्याच रात्री हाजीला बंदोबस्तात नागपूर येथील कारागृहात घेऊन जावे लागले. पोलीस गुंडाला अटक करतात. परंतु कारागृह प्रशासन कोणतीही मदत करीत नसल्याने पोलीस यंत्रणेतही नाराजी व्यक्त केली जात आहे.खतरनाक गुंड कारागृहात चंद्रपूरच्या कारागृहात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे असलेल्या खतरनाक गुंडांना ठेवण्यात आले आहे. सध्याही येथे काही गुन्हेगार असल्याची माहिती आहे. काही नक्षलवादीही या कारागृहात ठेवण्यात आल्याचा इतिहास आहे. असे असताना हाजीला या कारागृहात न ठेवण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न आहे. हा तर जबाबदारी झटकण्याचा प्रकारगुंड हादेखील शेवटी माणूसच असतो. कारागृहात दाखल झाल्यानंतर दक्ष राहून गुन्हेगाराच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणे, ही कारागृहाची जबाबदारी असते. मात्र अलिकडील काळात कारागृहातही बोकाळलेल्या गैरप्रकारामुळे गुंड कारागृह प्रशासनावर वरचढ होत आहेत, असेच कारागृह अधीक्षकांना सुचवायचे होते काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.