शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

मनपाने १,४९७ भाडेकरू दुकानदारांना दिलेल्या नोटीस दहशतीसाठीच

By admin | Updated: September 13, 2016 00:42 IST

चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील एक हजार ४९७ भाडेकरू दुकानदारांनी लिजचे नुतनीकरण न केल्यास ..

काँग्रेसचा आरोप : मालमत्ता करआकारणीच्या नव्या नोटीस नियमबाह्यचंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील एक हजार ४९७ भाडेकरू दुकानदारांनी लिजचे नुतनीकरण न केल्यास गाळे रिकामे करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. हा प्रकार गाळेधारकांमध्ये दहशत निर्माण करणारा असल्याची टीका काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन गावंडे गुरूजी यांनी केली आहे.महानगर पालिकेने मागील आठवड्यामध्ये चंद्रपूर शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले होते. ज्या गाळेधारकांनी लिजचे नुतनीकरणे केले नसेल अशांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यावर गाळेधारकांमध्ये बरीच खळबळ उडाली होती. दरम्यान, गाळेधारकांच्या एका शिष्ठमंडळाने माजी खासदार नरेश पुगलिया यांची भेट घेवून आपबिती मांडली. नगरपालिका अस्तित्वात असताना आणि पुढे महानगर पालिका अस्तित्वात आल्यावर अनेक गाळेधारकांनी आपसी समझोत्याने अथवा नाईलाजाने गाळे दुसऱ्यांना हस्तांतरित केले होते. त्या बदल्यात हस्तांतरण शुल्क म्हणून २५ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. बरेचदा व्यापाऱ्यांनी आर्थिक स्थिती वाईट असते, अथवा ज्याच्या नावे गाळा असेल त्याचा मृत्यू झाल्याने मुलांना गाळा हस्तांरित करण्याची प्रक्रिया झाली आहे. त्या बदल्यात मनपाने शुल्कही जमा करून घेतली असताना आयुक्तांनी असा निर्णय घेतल्याबद्दल गावंडे गुरूजी यांनी या पत्रातून आश्चर्य व्यक्त केले आहे.मालमत्ता कराच्या आकारणीसाठी आलेल्या नोटीसांवरही या पत्रातून आक्षेप घेण्यात आला आहे. महानगर पालिकेने मालमत्ता करात वाढ केल्यावर जनआंदोलन झाले होते. अखेर मनपाने आमसभेत निर्णय घेवून जुन्या दराने मालमत्ता कर घेण्याचे ठरविले होते. असे असतानाही नव्या दराने आकारणीच्या नोटीस आल्या आहेत. दबावतंत्राचा वापर करून जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व निर्णयांवर मनपा आयुक्तांनी फेरविचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा. असे न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गांधी शाळेच्या ‘त्या’ जागेवर स्वच्छतागृह उभारण्यास विरोधगांधी चौकालगत असलेल्या महात्मा गांधी प्राथमिक शाळेच्या सध्याच्या जागेवर स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भातील पत्र आयुक्तांनी काही नगरसेवकांना पाठविले आहे. मात्र यावर काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. ही शाळा ऐतिहासिक असून अनेक विद्यार्थी येथून घडले आहेत. या जागेभोवती दोन मंदीरे, पोलीस स्टेशन महानगर पालिकेची इमारत आणि बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह न उभारता वाचनालय उभारावे अथवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असा पर्याय ठेवण्यात आला आहे.