शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मनपा, वेकोलिसह १४ उद्योगांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.

ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रण मंडळ गंभीर : हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांपर्यंत आणा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या व सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा ‘पर्यावरण भरपाई’चा शॉक दिला होता. हा धक्का सहन करतानाच आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांना नवा धक्का दिला आहे. वेकोलिच्या पाच खाणी, सहा उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण व चंद्रपूर महापालिका, अशा १४ जणांना नोटीस बजावून प्रदूषणावर नियंत्रण आणून हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिले आहे.४ मार्च रोजी जारी केलेल्या या नोटीसमध्ये आपापल्या परिसरात व मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे व पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले आहेत.चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारा यावेळी ज्या उद्योगांना ही नोटीस जारी केली आहे त्यात चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्र, धारिवाला इन्फ्रास्ट्रक्चर लि., ग्रेस मेटॅलिक प्रा. लि., घुग्घुस येथील लॉयड मेटल्स, एसीसी सिमेंट, बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त, राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाचे अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह वेकोलि चंद्रपूरची लालपेठ, दुर्गापूर, पदमापूर ओपनकास्ट, वणी क्षेत्रातील घुग्घुस ओपनकास्ट व बल्लारपूर क्षेत्रातील बल्लारपूर ओपनकास्ट या कोळसा खाणींचा समावेश आहे.उपरोक्त उद्योगांना यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे नोटीस बजावण्यात आला आहे. काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही.त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.नियमानुसार या उद्योगाकडून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रदूषणाच्या मानकाचे पालन केले तर चंद्रपुरातील पूर्ण नाही तर किमान अर्धे प्रदूषण कमी होणे शक्य आहे, असे या नोटीसमध्ये नमूद आहे. यावरील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहेत.मानकाच्या आसपासही पोहचले नाही उद्योगप्रदूषण कमी करणाऱ्या नियमाची चंद्रपूरलगतच्या उद्योगांकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे प्रदूषणासंदर्भातील मानकापर्यंत कोणताही उद्योग अद्याप पोहचू शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अद्यापही शुध्द हवा मिळत नाही. प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांनी सांगितले की कोळसा खाणीसाठी असलेल्या मानकानुसार एसपीएमची मात्रा ५०० तथा आरएसपीएमची मात्रा २५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. स्पंज आयरन उद्योगासाठी ही मात्रा २००० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. मात्र प्रत्यक्षात उद्योग हा मानकाच्या जवळपासही पोहचू शकले नाही.प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योगांना नियमाचे पालन करावे लागणार आहे. सध्या हिरवळीचा परिसर ३३ टक्के आहे. तो वाढवून ४० टक्क्यांपर्यंत आणावा लागणार आहे. पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्याचे लक्ष आहे. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.- मधुकर लाड, प्रादेशिक अधिकारी,महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषण