शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

मनपा, वेकोलिसह १४ उद्योगांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.

ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रण मंडळ गंभीर : हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांपर्यंत आणा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या व सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा ‘पर्यावरण भरपाई’चा शॉक दिला होता. हा धक्का सहन करतानाच आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांना नवा धक्का दिला आहे. वेकोलिच्या पाच खाणी, सहा उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण व चंद्रपूर महापालिका, अशा १४ जणांना नोटीस बजावून प्रदूषणावर नियंत्रण आणून हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिले आहे.४ मार्च रोजी जारी केलेल्या या नोटीसमध्ये आपापल्या परिसरात व मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे व पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले आहेत.चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारा यावेळी ज्या उद्योगांना ही नोटीस जारी केली आहे त्यात चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्र, धारिवाला इन्फ्रास्ट्रक्चर लि., ग्रेस मेटॅलिक प्रा. लि., घुग्घुस येथील लॉयड मेटल्स, एसीसी सिमेंट, बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त, राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाचे अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह वेकोलि चंद्रपूरची लालपेठ, दुर्गापूर, पदमापूर ओपनकास्ट, वणी क्षेत्रातील घुग्घुस ओपनकास्ट व बल्लारपूर क्षेत्रातील बल्लारपूर ओपनकास्ट या कोळसा खाणींचा समावेश आहे.उपरोक्त उद्योगांना यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे नोटीस बजावण्यात आला आहे. काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही.त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.नियमानुसार या उद्योगाकडून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रदूषणाच्या मानकाचे पालन केले तर चंद्रपुरातील पूर्ण नाही तर किमान अर्धे प्रदूषण कमी होणे शक्य आहे, असे या नोटीसमध्ये नमूद आहे. यावरील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहेत.मानकाच्या आसपासही पोहचले नाही उद्योगप्रदूषण कमी करणाऱ्या नियमाची चंद्रपूरलगतच्या उद्योगांकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे प्रदूषणासंदर्भातील मानकापर्यंत कोणताही उद्योग अद्याप पोहचू शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अद्यापही शुध्द हवा मिळत नाही. प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांनी सांगितले की कोळसा खाणीसाठी असलेल्या मानकानुसार एसपीएमची मात्रा ५०० तथा आरएसपीएमची मात्रा २५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. स्पंज आयरन उद्योगासाठी ही मात्रा २००० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. मात्र प्रत्यक्षात उद्योग हा मानकाच्या जवळपासही पोहचू शकले नाही.प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योगांना नियमाचे पालन करावे लागणार आहे. सध्या हिरवळीचा परिसर ३३ टक्के आहे. तो वाढवून ४० टक्क्यांपर्यंत आणावा लागणार आहे. पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्याचे लक्ष आहे. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.- मधुकर लाड, प्रादेशिक अधिकारी,महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषण