शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

अठ्ठावन्न नाही, पन्नास-आठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 01:03 IST

मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसंख्यावाचनाच्या नव्या पद्धतीत गणिती कल्पकतेला वाव, भाषा सौंदर्य लोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे. भाषा सौंदर्यावर जसा हा परिणाम करणारा बदल आहे, तसा व्यावहारिकदृष्ट्याही प्रतिकुल ठरेल अशी खंतही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा नवा बदल घोकमपट्टीऐवजी समज वाढविणारा असल्याने स्वागतही झाले आहे. पारंपरिक संख्या वाचनाच्या पद्धतीतून अनेक पिढ्या शिकल्या आहेत. मग त्यांना जोडाक्षरे अन् गणिताची भीती नव्हती का? असा सवाल शिक्षकांचा आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे या पद्धतीमुळे नामशेष होतील. परिणामी, ही पद्धत भाषा सौंदर्यात कशी बसणार, अशी खंत काहींची असली तरी स्वागतही समपातळीवर आहे. नवी पद्धत दाक्षिणात्य असून इंग्रजीच्या धर्तीवर आहे. सुरुवातीला ही पद्धत प्रथमत: गोंधळाची वाटत आहे. परंतु, गणिती कल्पकतेला वाव देणारी आणि भाषा सौंदर्यावर शून्य परिणाम करणारी ठरेल, असा विश्वासही जिल्ह्यातील गणित विषय शिक्षकांनी व्यक्त केला आहे.नवीन बदल झालेच पाहिजेनवी पद्धत गणिती कल्पकतेला वाव देणारी आहे. सुरुवातीला गोंधळ वाटत असला ही पद्धत मुले सहजपणे आत्मसात करीत. चार वर्षांपूर्वी असा बदल करण्याची आवश्यकता मी विद्या प्राधिकरणाकडे सुचविला होता. अभ्यासक्रमात नवीन बदल झाले पाहिजे. हे बदल स्वीकारण्यास हरकत नसावी.-अनिल माटे, जि.प. शाळा कावडगोंदीयापूर्वी स्थानिक स्थळांचा वापर करून संख्यावाचन केले जात होते. आता संख्या वाचनाचे इंग्रजी भाषांतर आले आहे. नवीन अभ्यासक्रमातील बदल तांत्रिक आहे. ७२ म्हणणे अथवा सात दोन म्हणणे यात काही फरक पडत नाही. यातून मुलांच्या गुणात्मक विकासात कोणता बदल होणार हे कळायला मार्ग नाही.- अनिल शिंदे, प्राचार्य, कला, वाणिज्य महाविद्यालय बल्लारपूरवीस-दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना आत्मसात करणे कठीण जाणार आहे. हा बदल करताना शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले नाही. गणिती कल्पकतेला चालना मिळेल, असे यात काहीच नाही. या बदलांचा मुख्य हेतू काय, हेही अद्याप स्पष्ट न झाल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम वाढू शकतो. या बदलाचा पूनर्विचार व्हायला हवा.- सुनील शेरकी, राष्ट्रमाता विद्यालय पोंभुर्णाबालभारतीने गणितातील संख्येबाबत नवीन संकल्पनेचा विचार केला. त्यानुसार पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. येत्या २६ जून रोजी शाळा सुरू असल्याने संख्या वाचनाविषयी घाईने बोलण्यात अर्थ नाही, असे मला वाटते. शिक्षकांनी नवीन पद्धतीनुसार शिकविल्यानंतर विद्यार्थी स्वीकारू अथवा गोंधळू शकतात. मात्र, शिकविण्यापूर्वीच हे दोन्ही निष्कर्ष काढणे अनाठायी आहे.- मंजुषा डंभारे, जि. प. शाळा बोर्डा (बो.)पारंपरिक पद्धतीनुसार अनेक पिढ्यांनी अंकवाचन शिकले आहे. त्यामुळे ही नवी पद्धत आणण्याचे कारण कळले नाही. अभ्यासक्रमात बदल व्हायलाच पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार दुर्लक्षित होऊ नये. शास्त्रशुद्ध भूमिका असावी. शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना अंमलात येत आहे. यात विद्यार्थ्यांचे अहित होऊ नये.के. डब्लू. धोटे, मुख्याध्याक जि. प. शाळा बाखर्डीगणिताच्या निर्मितीमागे संस्कृती लपली आहे. त्यामुळे असे प्रयोग करताना या पैलुचाही विचार केला पाहिजे. मराठीतील अनेक म्हणी गणिती भाषेतून आल्या आहेत. त्यामुळे मुलांवर पाश्चिमात्त्य विचार लादणे कदापि योग्य नाही. संख्या वाचनाचा बदल केवळ दुसरीसाठी झाला. तिसरी, चौथी व पाचवीत हा प्रकार नाही. त्यामुळे मुलांच्या आकलन क्षमतेत अडचणी येतील. भाषेची रसिकता संपेल. त्यामुळे बालभारतीने केलेला बदल गरजेचा वाटत नाही.- प्रकाश कुमरे, जि.प. शाळा वरवट

टॅग्स :Educationशिक्षण