शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता तर नाहीच, आरोग्य सेवाही मिळत नाही!

By admin | Updated: September 1, 2016 01:26 IST

एकीकडे शहरात गुळगुळीत रस्ते पाहायला मिळते. त्यामुळे खराब रस्ता कशाला म्हणतात, हे शहरवासीयांना समजले नसेल. पण शहर सोडले की पहाडावर भयाण स्थिती आहे.

नागरिक भोगतात नरकयातना : गौरी (कामतगुडा) गावातील स्थिती शंकर चव्हाण जिवतीएकीकडे शहरात गुळगुळीत रस्ते पाहायला मिळते. त्यामुळे खराब रस्ता कशाला म्हणतात, हे शहरवासीयांना समजले नसेल. पण शहर सोडले की पहाडावर भयाण स्थिती आहे. अनेक गाव गुड्यातील रस्ते पाहिल्यास जीवन जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, याचे वास्तव लक्षात येईल. अशा कठीण परीस्थितीत पहाडावरील नागरिक जगत असून अशीच विदारक स्थिती दोन राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या पुडीयालमोहदा ग्रामपंचायत मधील गौरी (कामतगुडा) गावात बघायला मिळत आहे.तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर हे गाव आहे. गावात विकासाची गंगा वाहण्यासाठी डांबरीकरणाचे रस्ते नाहीत. त्यामुळे शासनाची दोन शिक्षकी शाळा सोडली तर गावात कुठल्याच योजनेचा श्रीगणेशा झाला नाही. गाव दोन राज्याच्या कचाट्यात आहे. दोन्ही राज्याची विकास यंत्रणा या गावात राबवली जाते. मात्र पक्या रस्त्याची सोय करण्यात दोन्ही राज्य अपयशी ठरले आहेत.शासन एकीकडे डिजीटल भारताची स्वप्न बघत आहे तर दुसरीकडे रस्त्याअभावी नागरिकांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. गावात जायला योग्य रस्ते व्हावे, शासनाच्या मुलभुत सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठरावही घेण्यात आला; शासन दरबारी दाद मागितली. पण कुणालाही पाझर फुटला नसल्याचे मत नागरिकांनी जि.प.सदस्य पंकज पवार यांच्या समोर मांडली.सीमावादात अडकलेल्या गावाचे शासन निकाल लावत नाही आणि विकासही करत नाही. त्यामुळे येथील नागरिक हतबल झाले आहेत. गावात दोन्ही राज्यातर्फे निवडणूका घेतल्या जातात. येथील मतदारांच्या भरोशावर लोकप्रतिनिधी सत्ता भोगतात. परंतु, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नसल्याचे बोलले जात आहे. आज गावात जायला रस्ता नाही, आरोग्याच्या सोयीसुविधा गावात मिळत नाही, रोजगाराची साधने नाही यासह अनेक समस्या गावात आवासुन असून आता तरी या रखडलेल्या समस्या सुटतील काय, असे प्रश्न नागरिक करीत आहेत. सीमावाद सुटेल काय? गेल्या अनेक वर्षापासून जिवती तालुक्यातील १४ गावांचा सीमावादाचा प्रश्न कायम असून या वादग्रस्त गावात दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत असतानाही मुलभूत सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत. संघर्षमय जीवन जगताना आमच्या अनेक पिढ्या निघून गेल्यात. पण आमच विकास झाला नाही. आम्ही नेमके कोणत्या राज्याचे आणि कुणाकडे न्याय मागायचे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून आता तरी सीमावाद सुटणार काय, असेही नागरिक विचारू लागले आहेत.