शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता तर नाहीच, आरोग्य सेवाही मिळत नाही!

By admin | Updated: September 1, 2016 01:26 IST

एकीकडे शहरात गुळगुळीत रस्ते पाहायला मिळते. त्यामुळे खराब रस्ता कशाला म्हणतात, हे शहरवासीयांना समजले नसेल. पण शहर सोडले की पहाडावर भयाण स्थिती आहे.

नागरिक भोगतात नरकयातना : गौरी (कामतगुडा) गावातील स्थिती शंकर चव्हाण जिवतीएकीकडे शहरात गुळगुळीत रस्ते पाहायला मिळते. त्यामुळे खराब रस्ता कशाला म्हणतात, हे शहरवासीयांना समजले नसेल. पण शहर सोडले की पहाडावर भयाण स्थिती आहे. अनेक गाव गुड्यातील रस्ते पाहिल्यास जीवन जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, याचे वास्तव लक्षात येईल. अशा कठीण परीस्थितीत पहाडावरील नागरिक जगत असून अशीच विदारक स्थिती दोन राज्याच्या कचाट्यात सापडलेल्या पुडीयालमोहदा ग्रामपंचायत मधील गौरी (कामतगुडा) गावात बघायला मिळत आहे.तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर हे गाव आहे. गावात विकासाची गंगा वाहण्यासाठी डांबरीकरणाचे रस्ते नाहीत. त्यामुळे शासनाची दोन शिक्षकी शाळा सोडली तर गावात कुठल्याच योजनेचा श्रीगणेशा झाला नाही. गाव दोन राज्याच्या कचाट्यात आहे. दोन्ही राज्याची विकास यंत्रणा या गावात राबवली जाते. मात्र पक्या रस्त्याची सोय करण्यात दोन्ही राज्य अपयशी ठरले आहेत.शासन एकीकडे डिजीटल भारताची स्वप्न बघत आहे तर दुसरीकडे रस्त्याअभावी नागरिकांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. गावात जायला योग्य रस्ते व्हावे, शासनाच्या मुलभुत सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठरावही घेण्यात आला; शासन दरबारी दाद मागितली. पण कुणालाही पाझर फुटला नसल्याचे मत नागरिकांनी जि.प.सदस्य पंकज पवार यांच्या समोर मांडली.सीमावादात अडकलेल्या गावाचे शासन निकाल लावत नाही आणि विकासही करत नाही. त्यामुळे येथील नागरिक हतबल झाले आहेत. गावात दोन्ही राज्यातर्फे निवडणूका घेतल्या जातात. येथील मतदारांच्या भरोशावर लोकप्रतिनिधी सत्ता भोगतात. परंतु, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नसल्याचे बोलले जात आहे. आज गावात जायला रस्ता नाही, आरोग्याच्या सोयीसुविधा गावात मिळत नाही, रोजगाराची साधने नाही यासह अनेक समस्या गावात आवासुन असून आता तरी या रखडलेल्या समस्या सुटतील काय, असे प्रश्न नागरिक करीत आहेत. सीमावाद सुटेल काय? गेल्या अनेक वर्षापासून जिवती तालुक्यातील १४ गावांचा सीमावादाचा प्रश्न कायम असून या वादग्रस्त गावात दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत असतानाही मुलभूत सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत. संघर्षमय जीवन जगताना आमच्या अनेक पिढ्या निघून गेल्यात. पण आमच विकास झाला नाही. आम्ही नेमके कोणत्या राज्याचे आणि कुणाकडे न्याय मागायचे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून आता तरी सीमावाद सुटणार काय, असेही नागरिक विचारू लागले आहेत.