शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ना ग्रामपंचायत राहिली, ना नगरपंचायत झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

भिसी : जानेवारी २०२१मध्ये भिसी ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर भिसी नगरपंचायत होणार असल्याची पहिली अधिसूचना ...

भिसी : जानेवारी २०२१मध्ये भिसी ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर भिसी नगरपंचायत होणार असल्याची पहिली अधिसूचना शासनाने काढली. त्यामुळे एकदा ग्रामपंचायत व काही महिन्यातच नगरपंचायत निवडणूक लढावी लागेल, त्यापेक्षा सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन थेट नगरपंचायत निवडणूक लढवायची, असा सर्व गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. एकूण ६७ पैकी ६६ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. निवडणूक रद्द झाली. भिसी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र सहा महिने लोटले तरी भिसी नगरपंचायत होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता स्थानिक सर्व राजकीय गट व जनताही हैराण झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज उचलल्याचा उमेदवारांना आता पश्चाताप होत आहे.

आपापल्या वाॅर्डातील परिचित लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावातील जनता हक्काने आपापल्या समस्या सोडवायची. पण आता ही सोयच उरली नाही. १७ सदस्य असलेल्या भिसी ग्रामपंचायतीवर आता किती काळ प्रशासकाची सत्ता राहील, हा प्रश्न नेते व उमेदवारी अर्ज उचलणाऱ्यांना सतावत आहे. अरविंद रेवतकर गट, धनराज मुंगले गट, किशोर मुंगले गट, वंचित आघाडी गट, अनेक अपक्ष उमेदवार यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.

आपण फॉर्म उचलले नसते तर गावावर ही पाळीच आली नसती, असे मत व्यक्त करताना तत्कालीन उमेदवार दिसतात. प्रशासक व प्रभारी ग्रामसचिव या दोघांच्या खांद्यावर भिसीसारख्या १७ ते १८ हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावाचा भार आहे. दोन अधिकाऱ्यांना कामाच्या मर्यादा आहेतच. त्यामुळे लोकांचे वेळेत प्रश्न सोडविणे व विकासही करणे यालाही मर्यादा पडतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करण्यात आले. नगरपंचायतीची सगळी प्रक्रिया थांबली. आता या प्रक्रियेला वेग देण्यात यावा, लवकरात लवकर भिसी नगरपंचायतीची निर्मिती करून निवडणूक घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नगरपंचायत निर्मितीची प्रक्रिया थांबली होती. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत नगरपंचायत निर्मितीचा कार्यक्रम निघू शकतो. त्यानंतर प्रभागनिर्मिती, मतदार याद्या, परिसिमन इत्यादी कामे होतील. नगरपंचायत निर्मितीला वेळ लागेल, नेमका किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. आता प्रशासकांमार्फतच गावाचा कारभार चालेल.

- संजय नागटिळक,

तहसीलदार, चिमूर.