अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा
कोरपना : येथील रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. बसथांबा ते मुख्य मार्गावर अतिक्रमण वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथे कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे अनेकजण रस्त्याच्या कडेलाच वाहने उभे करीत असतात.
बसमुळे वाहनधारकांना अडथळा
चंद्रपूर : शहरात मोठ्या संख्येने स्कूलबस आहेत. काही संस्थेकडे बसला थांबण्यासाठी जागा नसल्याने अनेकवेळा स्कूलबस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढल्या
बल्लारपूर : शासनाने शासकीय कार्यालयातील कामकाजामध्ये गती यावी, नागरिकांचे प्रश्न त्वरित सुटावे, सोबतच विविध शासकीय योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी काही कार्यालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत.
ऑटो चालकांचा मनमानी कारभार
चंद्रपूर : शहरात शेकडो ऑटो चालक आहेत. मात्र, त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऑटो चालक रस्त्यात कुठेही वाहन उभे करीत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.