शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कोरोना संघर्षात पुढील दहा दिवस महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. तर वरोरा परिसरात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत परराज्यातील ४५ कुटुंबांना १५ दिवसांचे अन्नधान्य देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : सोशल डिस्टन्सिंग पाळा; जिल्ह्याच्या सिमा कडेकोट बंद ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. शहर, गाव, तालुका यांच्या प्रत्येकाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. यातील सर्व यंत्रणेने अशा परिस्थितीत अतिशय गांभीर्याने आपापली जबाबदारी पार पाडावी. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयासाठी शासन प्रयत्नरत आहे. तरीही बाहेर पडला तर आपसात सामाजिक अंतर पाळावे. पुढील दहा दिवस आणखी थोडी झळ सोसावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. तर वरोरा परिसरात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत परराज्यातील ४५ कुटुंबांना १५ दिवसांचे अन्नधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारागृहात पाच हजारावर विविध राज्यातील व अन्य जिल्ह्यातील नागरिक मुक्कामी असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे. महानगरपालिकामार्फत निराश्रित, निराधार, बेघर व विमनस्क व्यक्तींना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तयार भोजनाचे वितरण होत आहे. यासोबतच महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी ज्येष्ठ नागरिक, निराधार व दिव्यांगांना त्यांच्या पैशाने घरपोच किराणा व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी एका टिमचे गठण केले आहे. त्यांच्यामार्फत घरपोच ही सेवा देण्यात येत आहे.महावीर जयंतीला घरातूनच प्रार्थना करा - वडेट्टीवारभगवान महावीर यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली आहे. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. त्या शिकवणीनुसार सर्वांनी आचरण ठेवल्यास संपूर्ण मानवजात सुखी होईल, असे मत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. महावीर जयंतीनिमिताने दरवर्षी अनेक जैन बांधव भजन संध्येसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. मात्र यंदा सर्व सणांवर कोरोना नामक संकटाचे सावट असल्याने मोठा उत्सव साजरे करणे तरी शक्य होणार नाही. त्यामुळे यंदा महावीर जयंतीला नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोरोना या विषाणू प्रादुर्भावाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि घराबाहेर पडणे टाळावे, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातूनच करावी, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जैन बांधवांना केले आहे.बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची नोंदग्रामीण भागात आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन येणाºया नागरिकांची माहिती घेत आहे. गेल्या १७ फेब्रुवारी ते २१ मार्चपर्यंत ज्यांनी बाहेरगावी प्रवास केला, अशा सर्वांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणीदेखील केली जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याधिकारी कार्यालयामध्ये गठीत करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांमधूनदेखील दहा वेगळ्या फोन लाईन्समार्फत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना दूरध्वनी करून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी अशा संदर्भातील तपासणीसाठी येणाºया दूरध्वनीला व कर्मचाऱ्यांना योग्य प्रतिसाद द्यावा. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही चौकशी होत असून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.२०१ जण क्वारंटाईन पूर्ण होऊन मुक्तदरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदेशात प्रवास करून आलेल्या फक्त तीन व्यक्तींना निगराणीत सध्या ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १४ दिवस होम क्वारंटाईनचा अवधी २०१ नागरिकांनी पूर्ण केला आहे. २०१४ नागरिकांची आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे.धान्याचे मोफत वाटपजिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना एक महिन्याचे रेशन वाटप सुरू झाले आहे. आपल्या रेशन कार्डवर दोन व तीन रुपये दराने अन्य अन्नधान्य मिळत असताना प्रत्येक अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति माणसी पाच किलो तांदूळ मोफत वाटपदेखील सुरू झाले आहे.काही दिवस शिस्त पाळावीदरम्यान, पुढील दहा दिवस सुरू राहणाºया लाकडाऊन कालावधीत नागरिकांनी आतापर्यंत पाळलेली शिस्त कायम ठेवावी. चंद्रपूर शहरांमध्ये सामाजिक अंतर पाळून नागरिकांनी कोरोना आजाराचा प्रतिबंध करावा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असली तरी घरातील एकाच नागरिकाने आठवडयाभरातून एकदाच बाहेर पडून, हे साहित्य घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. रस्त्यावरील दुचाकी वाहनांची संख्या कमी करण्यासाठीदेखील त्यांनी निर्देशित केले असून पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस